Sunday, April 5, 2020

काव्यस्पर्धा क्र.4 "आंदन"

पोवारी काव्य स्पर्धा ४

विषय:- आंदन

भासी को रवसे जब् बिया
मामाक् हिरदयमा होसे स्पंदन
हर घडी मामाजी बिचार करसे
भासीला मी का लेवु आंदन

टुरीक् बियामा सजावट भारी
रस्तापर बी रवसे चऊक चांदन
बिया लगेपरको मोठो नेंगदस्तुर
पावना देसेत नवरीला आंदन

टुरीको संसार उभो करनसाती
टुरीक् बापलाच नही लगे चंदन
मनुन रिश्तेदार हातभार लगावन
भेटवस्तू देसेत, वला कसेत आंदन

पयले आलमारी संदुक पलंग रव्
गंज बर्तन रवत, सयपाक रांदन
केताक भया पैसा बर्तन पुकारत
जगजाहिर रव् बियाको आंदन

आंदन रवसे मदतसाती
वोला हुंडासंग नोको जोडो
जबरजस्ती क् मामलापायी
सजनहो रिश्ता नोको तोडो
****
डॉ. शेखराम परसरामजी येळेकर नागपूर
५/४/२०२०

Saturday, April 4, 2020

पोवारी बोली आणि लोकसाहित्य : एक दृष्टिक्षेप.

              फ्लोरिडा (अमेरिका) येथील एक स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक न्याय व अधिकारांकरिता लढणारी एक्टीव्हिस्ट (कार्यकर्ती) एल.आर.नाॅस्ट यांच्या एका प्रसिद्ध कवितेतील काही ओळी अशा आहेत ----
आपलीच कहानी बोलावी 
आपलीच कहानी सांगावी 
स्पष्ट, बुलंद आवाजात 
क्वचित अस्पष्ट बडबडीत सुद्धा ___
पण लिहावीच..., बोलावीच..., सांगावीच...,
आपली कहानी. 
काही स्वनामधन्य समजू शकणार नाहीत 
आमची ही कहानी, 
काही प्रतिष्ठित एखादेवेळी  
करतील अस्वीकार सुद्धा.
तरी काही लोक आहेत अजून 
जे समजू शकतील आमची कहानी,  
मानतील आमचे आभारही.
आणि नंतर घडेल 
एक जादू , एक चमत्कार...
येऊ लागतील मग काही अगम्य आवाज स्वीकाराचे,
काही कुजबुज सुद्धा स्वागताची.
पसरेल आसमंतात मग स्वर  ---
"मला सुद्धा सांगायचंय..., बोलायचंय..., लिहायचंय...,"
आणि मग संगठीत होईल 
तुमचा समाज 
तुमचे आप्तगण 
तुमचा कुळ सुद्धा  ----
तेव्हा तुम्ही उमजून जाल 
की
तुम्ही आता एकटे-दुकटे राहिला नाहीत !
     पोवार/पवार/पँवार समाज आणि त्यांची पोवारी/पवारी/पँवारी बोली सुद्धा वरील कवितेत नमूद वस्तुस्थितीप्रमाणेच आज अव्यक्त स्वरूपात लोकसाहित्याच्या एका कोप-यात दडलेलीच असून या बोलीच्या "बोलकां"ना एल.आर.नाॅस्ट सारख्या एखाद्या कवीच्या/प्रोत्साहकाच्या प्रोत्साहनपर मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. वस्तूतः पोवारी बोली ही खूप प्राचीन बोली असून इंग्रज भाषाविदांनी सुद्धा या बोलीच्या प्राचीनतेची ग्वाही दिलेली आहे. डाॅ.गणेश देवी यांच्या "भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण" या प्रकल्पांतर्गत पद्मगंधा प्रकाशन, पुणे द्वारा प्रकाशित "महाराष्ट्र" या खंडात महाराष्ट्रातील एकूण 60 बोलीभाषांची प्राथमिक माहिती देऊन त्यांची ओळख करून देण्यात आली आहे. या 60 बोलीभाषांच्या यादीत 9व्या क्रमांकावर पोवारी बोलीभाषेची अकरा पृृष्ठांमध्ये नोंद घेण्यात आली आहे. या नोंदी काहीशा फसव्या, भ्रामक, त्रुटीपूर्ण, इतिहासाच्या एकांगी व इतिहासाचे विकृत/भ्रमित आकलन असलेल्या अशा असल्या तरी पोवारी बोलीभाषेची नोंद एका विश्वस्तरीय शोध-प्रकल्पात झाली याचे अल्पसे समाधान आहे. (या नोंदींच्या यथायोग्य दुरुस्तीसाठी मी डाॅ.गणेश देवी यांच्यासोबत पत्रव्यवहार केल्यावर त्यांनी त्यातील चूक अप्रत्यक्षरित्या कबूल केली असून पुढील आवृत्तीमध्ये ह्या चुकांची दुरूस्ती करण्यात येईल असे मला त्यांनी कळविले आहे. त्यावर माझा सतत पाठपुरावा सुरू आहे.)  

      परंतु ह्या बोलीला स्वतःची स्वतंत्र अशी वेगळी लिपी नसल्याने ही बोली लिपीबद्ध मात्र होऊ शकलेली नाही. आदिवासी समाजाच्या बोलींसारखीच ही बोली सुद्धा फक्त बोलचालीत, लोकगीतात, लोकसाहित्यातच वाचिक/मौखिक व अप्रकाशित स्वरूपातच दडून राहिलेली आहे. परंतु गेल्या सुमारे 40-50 वर्षांच्या पोवार-समाज-जागृतीच्या चळवळीने ह्या बोलीला देवनागरी लिपीत लिपीबद्ध करायला प्रारंभ करून दिला आहे. जयपालसिंह पटले, डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे,.. सारख्या आज पंच्याहत्तरी पार केलेल्या/तथा एडव्होकेट मनराज पटले या दिवंगत झालेल्या समाज धूरीणांनी या बोलीला देवनागरीचा शिरेटोप चढवला असून आता लखनसिंह कटरे, देवेंद्र चौधरी, डाॅ.शेखराम येळेकर, रणदीप बिसने, पालिकचंद बिसने, तुफानसिंह पारधी, वाय.सी.चौधरी, आशिष अंबुले, देवेंद्र वासुदेव रहांगडाले, देवेंद्र (बंटी) रहांगडाले, वर्षा पटले-रहांगडाले, हिरदीलालजी ठाकरे, महेंद्रकुमार रहांगडाले, महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले, चिरंजीव बिसेन, ...... इत्यादी सुमारे 50-60 पोवारी-बोली साहित्यिक देवनागरी लिपीत पोवारी बोलीला आधुनिक कविता, कथा, लेखादींच्या रुपात लिपीबद्ध करीत आहेत. यवतमाळ येथे 2019 ला संपन्न झालेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, इतिहासात प्रथमच, पोवारी बोलीतील कविता सादर करण्याचा मान, पोवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळाचे सचिव श्री.देवेंद्र चौधरी यांना मिळाला आणि पोवारी बोलीला एका मोठ्या/अखिल भारतीय स्तरावरील व्यासपीठावरून व्यक्त होता आले. 

     असे असले तरी गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तथा बालाघाट, छिंदवाडा, शिवनी, बैतुल या मध्यप्रदेशातील जिल्ह्यांत गावागावात वसलेल्या पोवार समाजाच्या महिलांकडे (काही पुरुषांकडे सुद्धा) असलेला लोकगीते आणि इतर लोकसाहित्याचा खजिना अजून पूर्णत्वाने लिपीबद्ध व्हायचा आहे. हा संपूर्ण खजिना मौखिक रुपात पोवारी-महिला/पुरुषांच्या कंठात आणि मना-हृदयातच दडून आहे. या संदर्भात गेल्या 03 नोव्हेंबर 2018 ला "पोवारी बोली साहित्य कला संस्कृती मंडळा"ची स्थापना करण्यात आली असून दि.03 फेब्रुवारी  मार्च 2019 ला गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा या तालुकास्थळी पहिले एक दिवसीय अखिल भारतीय पोवारी बोली/भाषा साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न करण्यात आले. या संमेलनातील संपूर्ण कामकाज फक्त पोवारी बोलीभाषेतच पार पाडले जातात. 

    कोणतीही बोली आणि त्या बोलीभाषेतील लोकसाहित्य हे ॲकेडेमिक, घडवलेल्या बोनसाय वृक्षांसारखे एखाद्या राजपथावरील शोभादालनांसम नसते, तर ते यापेक्षा वेगळ्या अशा उबडखाबड भूमी, पठार, पहाडांवर अस्ताव्यस्त रुपात वाढलेल्या व लालभडक अग्निसंभार सांभाळून, पायपथासम जनपथाची शोभा वाढवत उभे असणा-या पलाशवृक्षांसारखे असते. आणि पोवारी बोलीभाषेतील लोकसाहित्य सुद्धा याला अपवाद नाहीच. असा हा ऐतिहासिक दस्तावेज लिखित व प्रकाशित स्वरूपात अभ्यासकांपुढे संशोधनासाठी ठेवणे अनिवार्यपणे आवश्यक ठरते. परंतु पोवारी बोलीतील लोकसाहित्याच्या अशा प्रकाशनाची पुरेपूर व्यवस्था अजून तरी मोठ्या प्रमाणात झालेली नाही, हे खरे आहे. 

    त्यातल्या त्यात डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी त्यांच्या "पोवारी/पवारी ज्ञानदीप" या लघु-शोध-ग्रंथात काही पोवारी लोकगीते व लोकसाहित्य संकलित करून प्रकाशित करण्याच्या महत्कार्याला यशस्वी हातभार लावला आहे. मुख्यतः लिखित आणि प्रकाशित साहित्यावरच कोणत्याही भाषेच्या अस्तित्व व महत्वाचे आकलन व तिचा अभ्यास शक्य असल्याने या वाचिक/मौखिक व अप्रकाशित स्वरूपात दडून असलेल्या पोवारी लोकगीतांना व इतर लोकसाहित्याला लिखित व प्रकाशित स्वरूपात आणण्यासाठी पोवारी साहित्य कला संस्कृती मंडळ प्राथम्याने कार्यरत झाले आहे.

    एक हिंदी भाषाशास्त्री डाॅ.मंजू अवस्थी (D.Lit.) यांनी त्यांच्या भाषा-बोली विषयक संशोधनात पोवारी बोलीच्या संशोधनदरम्यान असे विधान केले आहे की, जगातील कोणत्याही बोली/भाषेतील पहिले लोकगीत हे पोवारी/पँवारी/पवारी बोलीतील आहे. 

     अशा या प्राचीनतम अशा पोवारी/पँवारी/पवारी बोली/भाषेतील दोन लोकगीत व एक लोककथा, त्यांच्या मराठी भावानुवादासह, उदाहरणादाखल खाली देत आहे. 

१) विवाह गीत -
------------------
लग्नप्रसंगी मंडप सुताई दस्तूराचे वेळी गाईले जाणारे गीत-

बारा डेरी को मांडो गळी से ||धृ॰||

मांडो पर मंडाईन चला बेरू 
बेरूईन पर बिछाईन जांभूर की डारी 
जांभूर को डारी खाल्या शोभसे आंबा की तोरन ||१||

जवाई रामलाल मांडो सूत से 
सूत गोईता जवाई बापू तुमरो सेला घोरऽ से 
तोरन गोईता जवाई बापू तुमरो कास्टोऽ सुटसे ||२||

कुकू मा डोईता, सीता वो बाई 
तुमरी अंगोरी लाल भई से 
मांडो मा तोरन लगी से ||३||

(भावानुवाद :- बारा लाकडी खांबाचा मांडव उभारला आहे. मांडवावर ओले बास/वेळू, बासांवर जांभळाच्या  फांद्या आणि मांडवाखाली आंब्याचा पानाचे तोरण लावले आहे. 
जावई रामलाल (रामाचे लोक-नाव) मांडवाभोवती सुत गुंडाळतो आहे. त्यावेळी जावई बापूंचा शेला जमीनीवर सरपटतो आहे, जावयाचा कास्टा (धोतराचा कास्टा) सुटत आहे.
रामलालची पत्नी, त्याघरची लेक, सीता, (जावयाकडून) आपल्या डोईवर कुंकू लावून घेत आहे, त्यामुळे जावयाचे/तिचे बोट लाल झाले आहे. आणि मांडवाखाली तोरण लागली आहे.)

२)जात्यावरील गीत -
---------------------------
दरन मी दरूसू 
~~~~~~~~~
दरन मी दरूसू गा बाई, दरूसू पाच दाना 
मोरो माहेर को कारखाना ||

दरन मी दरूसू गा बाई, जानू पह्यले माता पिता 
मंग जानू मी राम सीता ||

दरन मी दरूसू गा बाई, दरूसू च्यार गहू 
राज करजो मोरो भाऊ ||

दरन मी दरूसू गा बाई, दरूसू कनकी पीठ 
मोरो माहेर को मुंग्या जोट ||

पंढरपूर की विठ्ठल रूखमाई 
रूखमाई से आंगन मा 
पानी भर् से रांजन मा 

दूर ल् आरखू मी मोरो भाई की चाल 
डावो हातमा दिस् से, झोरा लाल लाल ||
(संकलन - सतनबाई चौधरी, तोतलाडोह, जि.नागपूर)

भावानुवाद :- मी दळण दळते, पाच दाणे, माझ्या माहेरी मात्र 'कारखाना' आहे. दळण दळताना मला प्रथम आठवतात, माझे मायबाप आणि त्यानंतर राम सीता. मी चार दाणे गहू दळते, माझा भाऊ राज करेल. मी कणिक, पीठ दळते, माझ्या माहेरी मात्र मुंग्याही खातात (कणिक/पीठ). पंढरपूरातील विठ्ठलाची रूखमाई विठ्ठलासोबत माझ्या आंगणात आली आहे, ती रांजनात पाणी भरत आहे. मी दुरूनच माझ्या भावाच्या पावलांची चाहूल ओळखते, त्याच्या डाव्या हातात मला लाल रंगाचा थैला दिसतोय.
°°°
यानंतर एक उदाहरण पोवारी/पँवारी/पवारी लोककथा-सदृश्य अर्वाचीन कथेचे पाहू या -----

• राजकन्या सुरेखा, अरुना अना अमात्य-पुत्र...
-------------------------------------------------------------------
       राजा तैलादित्य येव एक महापराक्रमी राजा भय् गयेव. वोको राज्य सिरीफ सत्ताईस गावपुरतोच होतो, वोन कारन लका इतिहासमा वोकी नोंद दिस् नही. राजा तैलादित्य ला वोन समयको रिवाजापरमाटी तीन प्रमुख रानी होती. बायजादेवी, सयजादेवी आणि सारजादेवी. येको अलावा बिन-बिह्या की अनखी काही नारी अना दासी होतीच राणीवसामा. पयलो राणीला, बायजादेवीला दुय टूरी च होती. उनको नाव सुरेखादेवी अना अरुनादेवी. बाकी की दुय रानीहिनला औलाद नोहोती. राजबैैदन् बोहूत दवाई पानी करीस अना राजपुरोहितन् सब प्रकारको नवसादि-पूजापाठभी कराईस. पर वोन दुय रानीहीनला संतान को फायदा नही भयेव होतो. वय् दुुुही बिना-संतानच रही. वोको कारन लका मोठो रानी को वचक जरा जास्तीच होतो. राजा तैलादित्य को राजगद्दीवर बसनारो राजपुत्र नोहोतो तरी दुय सुंदर-सुंदर अना हुशार टूरी रहेवलका बायजादेवी को महत्व बाकी को दुय रानीपेक्ष्या जरा जास्तीच होतो.

      तसो देखीस त् राणीवसामाकी बिन-बिह्या की काही नारी अना दासीहीनला टूरुपोटू भया होता. पर वोन टूरुपोटू को खरो बाप को बारा मा राजा अना राजपुरोहितलाभी जरा शंकाच होती. असी साधार शंका रहेवलका राजाभी वोन टूराहीन ला राजपुत्र को दर्जा देय नही शकत होतो. तरी वोन टुराहीनपैकी एक टुरा जो बिन-बिह्या को  कमलजा नावको नारी को टुरा  होतो, वोको बल, बुद्धी व विद्या को प्रावीण्यलका वोला वोको उमर को सोरा साल माच् लहानो/कनिष्ठ अमात्य की जबाबदारी देनोमा आयी होती. वोन वा जबाबदारी बहुत चांगलो हिसाबलका संभालीभी होतीस. भयेव असो का, राज्य को सत्तावीस गावपैकी एक बरबसपुरा नावको गावको एक महाजनन राजा को खिलाफ बंड करी होतीस. तब् वोन टुरान् वू बंड मोडस्यानी काढी होतीस. तबपासना वोन टुरा को, (वोको नाव कचरुमल) महत्व राजदरबार मा बढन् लगेव् होतो. 
        कचरुमल को बढतो महत्त्व मुख्य अमात्य ढेरूमलला जरा टोचन् लगेव् होतो. काहे का भविष्य मा मंग्-पुढ् मुख्य अमात्य की जागा वोला मिल सकसे या बात मुख्य अमात्यला खटकत होती. मूनस्यार अमात्य ढेरूमलन् धीरू धीरू मोठी रानी बायजाबाई का कान भरनला सुरूवात करी होतीस. वोको परिनाम असो भयेव का, बायजाबाई की दुयी टूरी  सुरेखादेवी अना अरुनादेवी इन न राजदरबारमाको आपलो आवनो-जावनो अना अस्तित्व बढावनो सुरू करीन. लाहानी राजकन्या अरुनादेवी जरा जास्तच हस्तक्षेप करत होती. वोन राजकन्याको राजदरबारमाको अना राज्यकारभारमाको  बढतो आवनो-जावनो अना हस्तक्षेप देखस्यार राजा तैलादित्य मात्र मनको मनमा खुश/हर्षित होत होतो. येन् खुशीमा मुख्य अमात्य ढेरूमलको छुपेव् कारस्थानाकी उकल राजा तैलादित्यला करताच नही आयी.

      असोमाच् एक दिवस राजा तैलादित्य महारानी बायजादेवीको  महलमा रवतानीच् मुख्य अमात्य ढेरूमलन  परवानगी लका महलमा प्रवेश करीस अना राजाला याद कराय् देईस का आता दुही राजकन्या बिह्या लायक भयी सेती. वोको कारन आता उनको बिह्या की तजवीज करे पायजे. मोठी राजकन्या सुरेखादेवी लायीक दुसरो राज्य मालका एक सोयस्कर घरजवाई आनस्यानी वोको राज्यभिषेक करन को अना अरुनादेवी साठी जवर को राज्य को एखाद् राजा को चांगलो रूप, शक्ती, बुद्धी, विद्यालका प्रवीन राजपुत्रको संग् बिह्या कर देनको. वोकोलका राज्य की विभागनी नही होनकी अना दुही राज्यकन्याहीनला आपआपलो राज्य भेट सके.

     दुसरो दिवस राजदरबार मा येन निर्णय को घोषणा करनो मा आयी अना नवरदेव देखन की तयारी सुरू भयी.  कनिष्ठ/लहानो अमात्य कचरूमल पर सुरेखादेवी अना अरुणादेवी इनको साठी चांगला टुरा धूंडन की जवाबदारी सोपी गयी. अना चैत्र महिना को पोर्णिमाला बिह्या की आखनी को कार्यक्रम तयार करनोमा आयेव्. राजदरबार मा येव् निर्णय घोषित भयेव् वोन दिवस फागून महिना को शुक्ल पक्ष की पंचमी होती.
       राजा तैलादित्यको आदेशनुसार सब आपापलो कामगिरीमा रुजू भया. दिवस भराभर खतम होन लग्या. होरी आयी ना गयी. परसा फुलाय गयेव्. मुुुहुुरत जवर आवन् लगेेव्. असोमाच् काहीतरी गडबड होय रही से, असो लगन् लगेव्. काही-बाही कूजबूज आयकू आवत होती पन राजा तैलादित्य अना मुख्य अमात्य ढेरूमल शांत चित्तलका वोकोमालका /वोकोपरा उपाय काहाळ् लेयेत् असो लगत् होतो.

       पर बीचमाच् चैत्र महिना को शुक्ल पक्ष को द्वादशीलाच अचानक पहाट् पहाट् राजवाडा मा नगारा बजन् लग्या.  पुरी जनता राजवाडा को सामने जमन् लगी. थोडो बेरा मा कनिष्ठ अमात्य कचरुमल, राजा तैलादित्य, राणी सयजादेवी अना सारजादेवी, लाहानी राजकन्या अरुनादेवी इनला तोंड-हात बांधस्यानी अना हातकडी लगायस्यानी राजवाडा को ग्यालरी मा उभो करनोमा आयेव्. महाराणी बायजाबाई, मुख्य अमात्यको टुरा सुकारूमल अना मुख्य अमात्य ढेरूमल सामने आया. मुख्य राणी बायजाबाईन् घोषणा करीस का, तैलादित्य, कचरूमल, अरुनादेवी अना दुही लहान राणी इन न कट रचस्यांनी मुख्य राणी बायजाबाई व मोठी राजकन्या सुरेखादेवी इनला गयेव रातमा जीवलका मारन को प्रयत्न करीन. पन मुख्य अमात्यको शूरवीर पुत्र सुकारूमल अना मुख्य अमात्य ढेरूमल इन न बडो हिंमतलका उनको कट तोडस्यारी सप्पाई राजद्रोहीनला अटक करीन्. आता चैत्र पौर्णिमा ला राजकन्या सुरेखादेवी को मुख्य अमात्यको शूरवीर पुत्र सुकारूमल संग् बिह्या होये अना वोनच दिवस राज्यभिषेक बी होये.
        सब जनता न 'राजा सुकारूमल की जय' को नारा लगाईन् अना महाराणी बायजाबाई ला राजमाता को दर्जा प्रदान करीन.
-------------------------------------------------------------------

मराठी मध्ये अनुवाद-----  
 • राजकन्या सुरेखा, अरुणा आणि अमात्य-पुत्र..
-------------------------------------------------------------------
        राजा तैलादित्य हा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याचे राज्य फक्त सत्तावीस गावापुरतेच होते, त्यामुळे इतिहासात त्याची नोंद दिसून येत नाही. राजा तैलादित्य ला तत्कालीन रिवाजाप्रमाणे तीन प्रमुख राण्या होत्या. बायजादेवी, सयजादेवी आणि सारजादेवी. शिवाय बिन-लग्नाच्या काही बायका व दासी होत्याच राणीवशात. पहिल्या राणीला, बायजादेवीला दोन्ही कन्याच होत्या. त्यांची नावे अनुक्रमे सुरेखादेवी आणि अरुणादेवी. उर्वरित दोन्ही राण्यांना औलाद नव्हती. राजवैद्याने सारे औषधोपचार व राजपुरोहिताने सर्व प्रकारचे नवसादि-पूजापाठ करूनही ह्या दोन्ही राण्यांना काही अपत्य-लाभ होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे मोठ्या राणीचा वचक जरा जास्तच होता. जरी राजा तैलादित्य नंतर राजगद्दीवर बसणारा राजपुत्र नसला तरी दोन सुस्वरुप व सालस कन्या असल्याने बायजादेवीचे महत्व उर्वरित दोन्ही राण्यांपेक्षा अधिकच होते. 

      तसे पाहिले तर राणीवशातील इतर बिन-लग्नाच्या काही राण्यांना व दासींनाही पुत्रलाभ झालेला होता. पण त्या पुत्रांच्या पिता-निश्चितीबद्दल राजपुरोहितांना काही साधार शंका असल्याने राजा सुद्धा त्या पुत्रांना राजपुत्रांचा दर्जा प्रदान करू शकत नव्हता. तरी त्या पुत्रांपैकी एक पुत्र जो बिन-लग्नाच्या कमळजा नावाच्या राणीचा पुत्र होता, त्याच्या बल, बुद्धी व विद्या यातील प्रावीण्यामुळे त्याला त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच कनिष्ठ अमात्य म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्याने ती जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली सुद्धा होती. झाले असे की, राज्यातील सत्तावीस गावांपैकी एका बरबसपुरा नावाच्या गावातील एका महाजनाने केलेले राजाविरूद्धचे बंड त्या पुत्राने यशस्वीपणे मोडून काढले होते. तेव्हापासून त्या पुत्राचे, (त्याचे नाव कचरुमल) महत्व राजदरबारात वाढू लागले होते.

        कचरुमल चे वाढते महत्त्व मुख्य अमात्य ढेरूमल याला बोचू लागले होते, कारण त्या पुत्राद्वारे पुढे-मागे मुख्य अमात्याला शह देण्याची शक्यता मुख्य अमात्य ओळखून होता. म्हणूनच ढेरूमलने हळूहळू राणी बायजाबाईचे कान भरायला सुरूवात केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, बायजाबाईच्या दोन्ही कन्या सुरेखादेवी व अरुणादेवी यांनी राजदरबारातील आपला वावर व अस्तित्व वाढवला होता. राजकन्या अरुणादेवी जरा जास्तच हस्तक्षेप करायची. त्या राजकन्यांचा राजदरबारातील व राज्यकारभारातील वाढता वावर व अस्तित्व-जाणीव पाहून राजा तैलादित्य मात्र मनोमन सुखावत/सुखावला होता. मुख्य अमात्य ढेरूमलच्या कारस्थानाची उकल मात्र राजा तैलादित्य करू शकला नव्हता.

      अशातच एके दिवशी राजा तैलादित्य महाराणी बायजादेवीच्या महालात रमत असताना मुख्य अमात्य ढेरूमल तेथे परवानगी घेऊन प्रवेशता झाला. व अमात्याने कल्पना मांडली की, दोन्ही राजकन्या विवाहयोग्य झाल्या असल्याने आता त्यांच्या विवाहाची तजवीज करून सुरेखादेवीसाठी दूरच्या राज्यातून एक समर्पक, सुयोग्य घरजावई आणून त्याला राज्याभिषेक करावा तथा अरुणादेवीला शेजारच्याच एखाद्या राजाच्या सुस्वरूप व बल, बुद्धी, विद्येने प्रशंषित राजपुत्रासह विवाहबंधनात बांधावे. जेणेकरून ह्या राज्याची फाळणी न होता दोन्ही राजकन्यांना आपापले राज्य मिळू शकेल. 

       राजा तैलादित्य व महाराणी बायजादेवी यांना ही अमात्य-कल्पना पसंत पडली. राजाने ताबडतोब दोन्ही राजकन्या व उर्वरित दोन्ही राण्यांना तेथेच बोलावून घेतले आणि अमात्य-कल्पनेची कल्पना सर्वांना दिली. राजकन्या अरुणादेवी जरा नाराज असली तरी काही आढेवेढे, काही विचारविमर्शानंतर मुख्य अमात्याची कल्पना सर्वसंमतीने मान्य करण्यात आली.

     दुस-याच दिवशी राजदरबारात या निर्णयाची घोषणा करण्यात आली व वरसंशोधनाची वगैरे प्रक्रिया सुरू झाली. कनिष्ठ अमात्य कचरुमल वर सुरेखादेवी व अरुणादेवी यांच्यासाठी सुयोग्य वर शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली व येत्या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला विवाह-समारोह पार पाडण्याचे कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आले. राजदरबारात हा निर्णय झाला त्यादिवशी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी होती.

       राजा तैलादित्याच्या आदेशानुसार सर्व आपापल्या कामगिरीवर रुजू झाले. दिवस भराभर सरू लागले. होळी आली व गेली. पळस फूलून गेला. नियोजन पुढे सरकत असल्याचे जाणवत होते. काही-बाही कूजबूज ऐकू यायची पण राजा तैलादित्य व मुख्य अमात्य ढेरूमल त्यातून/त्यावर तोडगा काढत असत.

      अखेर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीलाच अचानक पहाटे पहाटे राजवाड्यात नगारे वाजू लागले. सारी रयत राजवाड्यासमोर जमू लागली. थोड्याच वेळात कनिष्ठ अमात्य कचरुमल, राजा तैलादित्य, राण्या सयजादेवी व सारजादेवी, राजकन्या अरुणादेवी यांना तोंड बांधून व हातकड्या घालून राजवाड्याच्या गॅलरीत उभे करण्यात आले. महाराणी बायजादेवी, राजकन्या सुरेखादेवी, मुख्य अमात्याचा पुत्र सुकारूमल व मुख्य अमात्य ढेरूमल समोर आले. आणि महाराणी बायजादेवीने घोषणा केली की, तैलादित्य, कचरुमल, अरुणादेवी व दोन राण्या यांनी मिळून कट रचला व गेल्या रात्री त्यांनी महाराणी बायजादेवी व ज्येष्ठ राजकन्या सुरेखादेवी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण मुख्य अमात्य ढेरूमल व त्याचा शूरवीर पुत्र सुकारूमल यांनी हा कट वेळीच मोडून काढला. सर्व राजद्रोह्यांना अटक करण्यात आली आहे. आता चैत्र पौर्णिमेला राजकन्या सुरेखादेवीचे अमात्यपुत्र सुकारूमलशी विवाह होईल व सुकारूमलला त्याच दिवशी राज्याभिषेकही करण्यात येईल. 

     सा-या रयतेने "राजा सुकारूमल की जय" असा नारा बुलंद केला आणि महाराणी बायजादेवीला राजमातेचा दर्जा प्रदान केला.
□□□
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(शब्द संख्या सुमारे--2225)
(आभार :- डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे आणि देवेंद्र चौधरी)
¤
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
22:10:19
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव

               मुख्यतः मध्यप्रदेश, महाराष्ट्र(विदर्भ), राजस्थान या भागात वसलेल्या अल्पसंख्य पोवार/पवार समाजाबद्दल इतर समाज बांधवात भरपूर गैर व भ्रामक समज आहेत. या पोवार समाजाची आपली एक वेगळीच बोलीभाषा असून तिला पोवारी/पवारी/पंवारी बोली या नावाने ओळखले जाते. ही बोली अजूनही ध्वनीनिष्ठ/ध्वनीबद्धच असून आता हळूहळू तिला लिपीनिष्ठ/लिपीबद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

      महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गोंदिया, भंडारा, तथा अंशतः नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात पोवार समाज मुख्यतः नद्यांच्या सान्निध्यात वसलेला आढळून येतो.

      पोवार समाजाची पोवारी बोली सध्या लुप्तप्राय होत असल्याचे आढळून येते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने मूळ शेती व्यवसायातून हा समाज काहीसा तुटत शहरवासी होऊ लागल्याने व आपली पोवारी बोली बोलायला संकोच वाटत असल्याने शहरवासी झालेल्या पोवार समाजातून पोवारी बोली हळूहळू हद्दपार होत चालली आहे. म्हणजे ही बोली टिकविण्याची मुख्य जबाबदारी ज्यांनी उचलणे आवश्यक होते, तेच शिक्षित कुटूंब या बोलीपासून दूर जात असल्याची दुर्दैवी बाब लक्षात आल्यावर तिच्या संरक्षण, विकासाची चिंता काही अभ्यासकांना जाणवू लागली. आणि अशा अभ्यासकांनी स्वतः पुढाकार घेऊन पोवारी बोली विषयक न्यूनगंड दूर करण्यासाठी प्रयत्न आरंभिले. अशा अभ्यासकांमध्ये जयपालसिंह पटले, डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे सारख्या नागपूर निवासी झालेल्या मूळ ग्रामवासींचा प्रामुख्याने समावेश आहे. 

       भाषा ही सर्व प्रकारच्या विकासाला कारणीभूत असते. कोणत्याही समाजाची बोली-भाषा ही त्या समाजाच्या इतिहास, संस्कृती, रिती-रिवाज, पर्यावरण, समाजकारण,  यांची प्रत्यक्ष वाहक व साक्ष असते. पर्यायाने आजच्या या युगात आपापल्या "मूळाकडे पाहण्याच्या" दृष्टीने बोलीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आल्याने तिच्या अस्तित्वरक्षणासाठी व संवर्धनासाठी जागरूक समाज-मन व जन सज्ज झाले/होत आहेत.   

        भारतीय अर्थकारण, राजकारण, समाजकारण, साहित्यकारण, विचारपद्धती व ग्राहक व्यवस्थेवर सकारात्मक/नकारात्मक असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम आणि प्रभाव पाडणा-या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)च्या प्रभावाला व अस्तित्वाला कोणालाही नाकारता येत नाही/येणार नाही. तथापि १९९१ नंतरच्या या संथ बदलाचे परिणाम व प्रभाव प्रारंभी "विशेष न जाणवणारे" असे राहिल्याने सुमारे २000 पर्यंत या बदलांची विशेष अशी दखल साहित्य क्षेत्रात व पर्यायाने भाषा व बोली क्षेत्रात प्रामुख्याने घेण्यात आल्याचे दिसत नाही. परंतु २००० नंतर हे बदल प्रत्येक भारतीयाच्या अंगावर, मनावर, इच्छेवर, विचारपद्धतीवर अगदी जोमाने आदळू लागल्यावर त्याचा प्रभाव व परिणाम प्रत्येकच भारतीय भाषेतील साहित्यावर जाणवू लागला. अशा या संक्रमण अवस्थेत बोलींचे भवितव्य काय, हा प्रश्न प्रत्येक बोली-बोलकां*ना भेडसावू लागला. कारण कोणतीही बोली ही फक्त संभाषण, संप्रेषण, कम्युनिकेशन पुरतीच मर्यादित नसून तिच्याद्वारे त्या-त्या बोली-बोलकांच्या सांस्कृतिक, आनुवंशिक, सामाजिक इतिहासाचे रक्षण व संवर्धन सुद्धा होत असते/झाले असते. त्यामुळे त्या-त्या बोली-बोलकांना आपापली बोली टिकविणे व तिचे संवर्धन करून तिचे लिखित स्वरूपात जतन करणे आवश्यक व अनिवार्य वाटू लागले. अगदी अशीच स्थिती पोवारी/पवारी/पंवारी बोलीच्या बोली-बोलकांना सुद्धा भेडसावू लागली व या बोलीच्या संवर्धन, विकसन, लेखन(लिपीबद्ध), संकलनासाठी पोवारी-बोली-बोलक जागृत झाले. 

         अशातच या इतिहास-प्रसिद्ध पोवारी/पवारी/पंवारी बोलीच्या "नावा"बद्दल काही भ्रम सुद्धा उद्भवू लागले. वस्तूतः महाराष्ट्रात या बोलीवर मराठी, झाडीबोली, गोंडीबोली यांच्या संगतीचा स्वाभाविक अभिसरण होऊन तिला "पोवारी" असे नाव पडले तर मध्यप्रदेशात हिंदीच्या संगतीने तिला "पवारी/पंवारी" असे नाव पडले. एकंदरीत या बोलीच्या "नावा"वर "संगतीचा परिणाम"(?) व्हायचा तो झालाच. सारांशाने म्हणावयाचे म्हणजे पोवारी/पवारी/पंवारी ही नावे स्थलभेदामुळे वेगळी-वेगळी वाटत(?) असली तरी ती एकाच बोलीची "नावे" आहेत, हे स्पष्ट व्हावे. 

        महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा व काहीसा चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत तथा नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा तसेच वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातील काही मोठ्या गावांमध्ये पोवार मालगुजार व पाटील असल्याने त्या-त्या गावात दुस-या समाजातील लोकं सुद्धा पोवारी बोलीचा सर्रास वापर करीत असत/करतात, असे आढळून येते. अशीच वस्तुस्थिती मध्यप्रदेशातील बालाघाट, शिवनी, छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यातही पहावयास मिळते. म्हणजेच पोवारी बोली ही फक्त पोवार समाजापूरती मर्यादित न राहता पोवार-बाहुल्य गावातून पोवारी बोलीला लोक-बोलीचे रूपही मिळाले होते/आहे, असेही आढळून येते. 

     या ऐतिहासिक पोवारीबोलीचा उगम/उद्गम कसा झाला याचे निदान संशोधक करतीलच, तसे संशोधन सुरू सुद्धा आहे. वास्तविक रित्या कोणतीही बोली ही "ध्वनीनिष्ठ" असते तर प्रमाण भाषा ही "लिपीनिष्ठ" असते. आणि त्यामुळेच बोलींना जेव्हा जेव्हा लिपीबद्ध करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा 'लिपीची मर्यादा' त्यासाठी अडसर ठरू लागते व बोलीचा इतिहास शोधणे दुष्कर होऊन बसते. या बोली आणि प्रमाण भाषा यांच्या आंतरसंबंधाबद्दल एक जागतिक किर्तीचे तत्वज्ञ, भाषाशास्त्री श्री.गणेश देवी म्हणतात की, "प्राचीन काळी संस्कृत भाषेत 'व्याख्या' या शब्दासाठी 'भाषा' शब्दाचा उपयोग होत असे.  ........पण 'भाषा' या शब्दात एक लपलेला अर्थ आहे, तो म्हणजे 'आवाज, ध्वनी'. खास करून केवळ लिपी असणा-या बोलीसच भाषा समजण्याच्या दहशतवादी प्रवृत्तीस शह द्यायचा असेल तर भाषा म्हणजे बोली किंवा बोल - अर्थात 'आवाज' मानणेच सयुक्तिक होईल."  याच संदर्भात कन्नड कादंबरीकार यू.आर.अनंतमूर्ती म्हणतात की, " भारतीय भाषांचा मूळस्रोत त्या भाषांच्या अंगणात व परसघरात आहे. पण ह्याही पलीकडे जाऊन असे स्वीकारले पाहिजे, की मान्य भाषांच्या अस्तित्वाची व प्रगतीची गुरुकिल्ली पोटभाषांच्या (बोलींच्या) हाती आहे." यावरून बोलींचे व बोली टिकवून ठेवण्याचे महत्व किती परमावश्यक आहे, हे स्पष्ट व्हावे.

     श्री.गणेश देवी यांचे यासंबंधीचे (भाषा व पोटभाषा/बोली संबंधीचे) विचार येथे पुन्हा उद्घृत करावेसे वाटतात. ते म्हणतात, "मानवी उत्क्रांतीतील कितीतरी गोष्टी अशा आहेत, की ज्यांविषयी कोणतेही शास्त्रीय विधान करणे अशक्य बनावे. त्यासंबंधी केवळ ठोकताळे बांधता यावेत आणि तेही असे की थेट त्यांच्या विरुद्धचे ठोकताळेही तेवढेच तर्कशुद्ध वाटावेत. भाषा या सामाजिक संस्थेची सुरुवात, तिच्या उद्भवाची नेमकी कारणे, तिच्या सुरुवातीच्या जडणघडणीतील घटनाक्रम हे उत्क्रांतीच्या ग्रंथातील सुरुवातीच्या व अस्पष्ट अक्षरांत लिहिलेल्या पानांप्रमाणे आहेत." ते पुढे म्हणतात की, "विश्वाची उत्पत्ती होत असताना कोणत्या प्रकारचा ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही, ह्यासंबंधी मत व्यक्त करणे शक्य असले तरीही ते मत सिद्ध करणे अशक्य आहे. ईश्वर अपौरुषेय आहे किंवा नाही यावर मत व्यक्त करण्यासारखेच तेही मत केवळ तत्त्वज्ञानात्मक तर्कसिद्धांताच्या स्वरूपाचे राहील. मानवाला व मानवाआधीच्या इतर प्राणिमात्राला, ध्वनिसंवेदन प्राप्त होण्याआधी, ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही हेही निश्चित करणे अशक्य आहे. अतीन्द्रिय अनुभवातून ऐकू येणारा सततचा ध्वनी - अनाहत नाद आणि स्वरयंत्रातून श्वास तोडून--जोडून बनविलेला ध्वनी हे दोन्ही एकाच प्रवृत्तीचे असतात किंवा नाही हे सांगणेही कठीण आहे. शिवाय अर्थव्यवहारासाठी (येथे आर्थिकव्यवहार अपेक्षित नसून शब्दार्थव्यवहार/meaning ध्वनित आहे) केवळ ध्वनीनियंत्रणाचाच मार्ग मनुष्यप्राण्याने का निवडला, डोळ्यांची भाषा विकसित करून अर्थ (meaning)- व्यवहार करण्याची क्षमता उपलब्ध असतानाही ती पूर्णपणे विकसित का केली नाही, हे सारे प्रश्न जरी विचारता आले तरीही त्यांची उत्तरे केवळ तर्काच्यापलीकडे नीटशी स्पष्टपणे मांडता येत नाहीत." हे थोडेसे लांबलेले उद्-घृत, बोलीविषयक अभ्यासाचे व बोलीच्या जतनाचे महत्व तथा बोलीचे भाषाव्यवहारातील स्थान- महात्म्य स्पष्ट करीत असल्याने हे धाडस केले आहे.        

          यासंदर्भात पोवारी बोलीचा विचार करताना काही ऐतिहासिक तथ्य सुद्धा विचारात घ्यावे लागतात हे स्पष्ट आहे. त्या अनुषंगाने ई.स.१०१० ते १०५५ या कालावधीदरम्यान होऊन गेलेले सम्राट राजा भोज हे पोवार समाजाचे प्रमुख पूर्वज असून ते स्वतः संस्कृतादि भाषांचे विद्वान होते, ते एक उत्कृष्ट व अपराजित शासकच नव्हे तर विविध विद्वत्तापूर्ण ग्रंथांचे कर्ते होते, त्यांच्या दरबारात उत्कृष्ट लेखकांची/विद्वानांची "हजेरी" असायची, हे ऐतिहासिक तथ्य लक्षात घेऊन ते आजच्या घडीला या पोवारीबोलीचे मुख्य प्रवर्तक मानल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे सम्राट राजा भोज यांच्या बृहद अशा राज्यपरिसरातील मालवा, धार या भागातील भाषिक व बोलीक* संस्कृतीचे संस्कार या पोवारीबोलीवर असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच या बोलीत आज इतक्या संक्रमणानंतरही मारवाडी, राजस्थानी, गुजराती, मालवी, निमाडी, आदि भाषा/बोलींचे अंश सापडतात.

            अकराव्या--बाराव्या शतकातील व त्यानंतरच्या मुस्लिम वंशीय आक्रमकांच्या आक्रमणानंतर तसेच नागपूर परिसरातील तत्कालीन परमार(पोवार) राज्यकर्त्यांच्या आगमनानंतर पोवार समाजात दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया घडून हा पोवार समाज वैनगंगा, वाघ, पांगोली नद्यांच्या सुपीक प्रदेशात स्थायिक झाला. शिवाय राजा जगदेव यांच्या नगरधन(रामटेक) येथील राज्य स्थापनेनंतर सुद्धा पोवार समाजातील योद्ध्यांचे विदर्भात स्थलांतर झाले व बदलत्या समयानुकुल या पोवार समाजाने तलवार त्यागून नांगर हाती धरला. या कामी गोंडवन भागातील गोंड राजांनी पोवार समाजाला जमीनदारी, मालगुजारी देऊन त्यांना शेतीसाठी जंगल/जमीन उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका निभावल्याचे आजवरच्या प्राथमिक संशोधनातून निष्पन्न होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड किल्ला आणि पोंभुर्णा/गोंडपिपरी,....... येथील संशोधन सुद्धा या पोवार समाजाच्या विदर्भातील तत्कालीन अस्तित्वाची साक्ष देतात. शिवाय मराठा/नागपूरकर भोसले यांच्या कालावधीत सध्याच्या गोंदिया जिल्ह्यातील कामठा या तत्कालीन परगण्याचे तत्कालीन प्रमुख चिमणाजी बहेकार यांच्या नेतृत्वाखाली पोवार योद्ध्यांनी कटक-युद्धात बजावलेल्या जबरदस्त कामगिरीने खुश होऊन त्या-त्या पोवार योद्ध्यांना मालगुजारी देण्यात आली, असेही काही इतिहासकारांचे निदान आहे.

            जागतिकीकरणाच्या या "उठ, जा आणि खा!" (उजाखा*) च्या युगात अचानकच प्रत्येक मानव-घटकामध्ये आपले मूळ शोधण्याची प्रेरणा कशी काय जागृत झाली, हा संशोधनाचाच विषय ठरावा. मात्र आनंदाची व कदाचित आश्चर्याची सुद्धा बाब म्हणजे या प्रेरणेने विविधतेचा दुस्वास न उमलता विविधतेतील एकता शोधण्याची प्रक्रिया सुद्धा मानव-घटकात अनायासेच कार्यान्वित झाली असल्याचे दिसून येते. त्या दृष्टीने विचार करता अशाच एका झाडीबोलीच्या एका संशोधक/अभ्यासकाचे मत या प्रकरणी विचारार्ह ठरते. त्यानुसार झाडीबोली ही मराठी भाषेची आजीच मानली जावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. कारण संस्कृत ही सर्व आधुनिक भाषांची जननी मानली तर संस्कृत ची जननी ही त्या आधुनिक भाषांची आजीच होणार ना! वस्तूतः संस्कृत ही काही स्वयंस्फूर्त/स्वनिर्मित भाषा नव्हे/नसावीच. म्हणजे संस्कृत ही संस्कारित भाषा कोणत्यातरी पुरातन बोलीपासून/बोलीतून तयार(!) झाली हे स्पष्टच आहे. आणि झाडीबोलीचे कूळ व मूळ अजूनतरी कोणालाही शोधता आले नसून झाडीबोलीतील खूप सारे शब्द मात्र संस्कृतात थोड्याबहुत फरकाने जसेच्या तसे स्वीकारले/वापरले गेले असल्याचे झाडीबोलीच्या या संशोधक/अभ्यासकाचे निष्कर्ष आहेत. पर्यायाने झाडीबोली ---> संस्कृत --> मराठी या क्रमाने झाडीबोली ही मराठीची आजी लागते, असा त्या संशोधकाचा आढावा आहे. अशाच प्रकारे पोवारी बोलीचे सुद्धा कूळ व मूळ अजूनही शोधले गेले नसल्याने पोवारी बोली सुद्धा संस्कृतची आई/सावत्र(?) आईच शोभावी! 

     या संदर्भात एका पौराणिक मिथकाची हकीगत अशी की, परशुरामाने काही विशिष्ट कारणांमुळे क्रोधप्रवण होऊन संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करण्यासाठी एकवीस वेळा तत्कालीन क्षत्रियांची सरसकट कत्तल केली. तेव्हा समाजात राजाअभावी माजलेल्या अनागोंदी, अराजक, भयावह स्थितीने आतंकित, भयकंपित व आशंकित होऊन ऋषी वशिष्ठ यांनी क्षत्रिय-उत्पत्ती साठी यज्ञ करून त्या यज्ञाग्निमधून चार क्षत्रिय वीर उत्पन्न/निर्माण(!) केले. यज्ञातून उत्पत्ती झाल्याने त्यांना "अग्नीवंशी क्षत्रिय" असे संबोधिले गेले. त्या चार वीरांपैकी एक महावीर म्हणजे पोवारांचा सर्वप्रथम पूर्वज, परमार किंवा प्रमार असे त्याचे तत्कालीन सर्वसमावेशक नामाभिधान! या परमार/प्रमार चा अपभ्रंश होता होता अखेर पोवार/पंवार/पवार हे नाव काळाच्या अंगणात स्थिर झाले. तर या तत्कालीन परमार/प्रमारांची बोली/भाषा म्हणजेच आजची ही संस्कारित पोवारी/पंवारी/पवारी बोली होय. असे हे पौराणिक मिथक लक्षात घेता पोवारी बोलीचे कूळ व मूळ शोधणे कसे व किती दुष्कर आहे हे स्पष्ट होऊन श्री.गणेश देवी यांचे यासंबंधीचे मत किती सयुक्तिक व प्रासंगिक आहे हे सुद्धा स्पष्ट होते.

      शिवाय डाॅ.दशरथ स्वामी यांच्या संशोधनपर लिखाणाचे (अग्निपुराण, पवार वंश) अवलोकन केले असता असे दिसून येते की, सम्राट अशोकाच्या अहिंसात्मक बौद्धधर्म प्रसाराच्या परिणामांमुळे त्याच्या पूत्र-पौत्रांच्या राज्यकालावधीत (इ.स.पूर्व 232 - 215) युद्धाशिवाय राज्य टिकविणे असंभव झाल्याच्या काळात लढवैय्या व योद्धा असलेल्या पोवार समाजाचा उद्गम झाला असावा, असा कयास वर्तवण्यात येतो. यावरूनही वर नमूद केलेले श्री.गणेश देवी यांच्या यासंबंधीच्या मताची महतीच अधोरेखित होते.

        पोवार समाजात प्रारंभी मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती असे दिसून येते. देवघरात एक, पुढच्या बाजूला अतिलघु चौकोन चिकटलेला थोडासा मोठा मातीचा चौकोनी बोहोला* व अंगणात दुसरा तसाच मातीचाच चौकोनी बोहोला, एवढेच पोवार समाजाचे मुख्य देव म्हणता येतील. वर्षातून दोनदा या बोहल्यांवरील काल्पनिक देवांची व लोखंडी वा इतर धातूच्या पणतीची जागा मात्र कुटूंब प्रमुखाद्वारे पूजा करून आलटून पालटून बदलली जाते. याला "देव उतरवणे" असे म्हटले जाते. हे बोहले म्हणजे शिवाचे प्रतीक मानले जातात. म्हणजेच पोवार समाज शिवपूजक होता/आहे, हे स्पष्ट होते. आता इतर समाजाच्या संपर्कात आल्यानंतर मात्र पोवार समाजातही बहू-मूर्तीपूजेने आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच पोवार समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजही पोवार समाजात हुंडापद्धत अस्तित्वात नाही. (इतर समाजाची देखासिखी मुळे काही क्षुल्लक अपवाद आढळून येतात, तेव्हा त्यांच्यावर अत्यधिक सामाजिक दबाव निर्माण होऊन त्यांनाही यापासून परावृत्त करण्याचे कार्य केले जाते.) याउलट ४०-५० वर्षांपूर्वी गरीब पोवार कुटूंबात वधूपक्षाला वरपक्षाकडून "दक्षिणा" देण्याची पद्धत होती. पोवार समाजाची ही वैशिष्ट्ये इतर समाजावर सकारात्मक प्रभाव टाकत असत. परंतु सध्याच्या या "उजाखा"च्या युगात पारिवारीक alienation, विभक्त कुटुंबे, परस्परांतील अंतर, वाढल्याने व्यक्ती-महत्वापोटी असे सर्वच सामाजिक प्रभाव प्रभावहीन ठरू लागले आहेत. शिवाय आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे पोवार समाजात "भिकारी" अजिबात नाहीत. 

       भारत सरकारच्या एका जुन्या सर्वेक्षणानुसार हिंदी ची उपभाषा/पोटभाषा/बोली म्हणून पोवारी बोलीचा/भाषेचा उल्लेख भाषासूचीत केलेला आहे. त्यानुसार पोवारी बोलणा-या भाषकांचा क्रमांक 42 वा असून 38-40 लक्ष लोकसंख्या असलेल्या पोवार समाजातील 4,25,745 पोवार लोक बोलचालीत अजूनही पोवारी बोली/भाषेचा वापर करतात, असे नमूद आहे. (ही आकडेवारी जुनीच आहे.)
     पोवारी बोली/भाषेवर सर्वप्रथम इंग्रजी भाषातज्ज्ञ सर जाॅर्ज अब्राहम गियर्सन यांनी संशोधन केले. दुसरे इंग्रजी विद्वान आर.व्ही.रसेल यांनी त्यांच्या "CASTS AND TRIBES OF C.P. AND BERAR" या ग्रंथात पोवारी बोली/भाषेचा आणखी थोडासा अभ्यास मांडला. नागपूर विद्यापीठातील डाॅ.सु.बा.कुलकर्णी यांनी प्रथमच, 1972 मध्ये पोवारी बोली/भाषेचा शास्त्रोक्त अभ्यास करून Ph.D. साठी प्रबंध सादर केला व त्यांना नागपूर विद्यापीठाद्वारे ती पदवी प्रदान करण्यात आली. 1999 मध्ये डाॅ.मंजू अवस्थी यांनी बालाघाट जिल्ह्यातील बोलींचा (पोवारी ही मुख्य बोली) अभ्यास सादर करून रायपूर विद्यापीठाची D.Lit. पदवी प्राप्त केली. त्यानंतर डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी 2011 पासून पोवारी बोली/भाषेचा भाषावैज्ञानिक पद्धतीने अभ्यासाचा विडा उचलला असून त्यांनी "पवारी ज्ञानदीप" हा महत्वाचा ग्रंथ सिद्ध केला आहे. नागपूरचेच जयपालसिंह पटले यांनी "पवार गाथा" व अन्य 5-6 पुस्तके पोवारी बोली/भाषेत प्रकाशित केली आहेत.

         यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे पोवारांचा विदर्भ संपर्क ही एक दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया आहे. अकराव्या शतकात नागपूरकडील प्रदेश मध्यप्रदेशातील धारच्या परमारवंशीय राजांच्या (राजा भोजशी संबंधित) मांडलिकीखाली होता. याची साक्ष भांदक येथील शके 1068 च्या नागनाथ मंदिरातील मराठी शिलालेखात आढळून येते. या शिलालेखात धर्मशील राजा पवार याने मंदिराचा जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे म्हटले आहे. नागपूरकर भोसल्यांच्या कारकीर्दीत तर अनेक पोवारांनी कटकपर्य॔त स्वा-या करून समशेर गाजविली आणि आपण शूर क्षत्रियांचे वंशज आहोत हे सिद्ध केले. समशेरीप्रमाणेच नांगर धरण्यातही पोवारांचा हात कोणी धरणार नाही. त्यांनी पूर्व विदर्भात व पश्चिम मध्य प्रदेशात गावोगावी तलाव बांधून वैनगंगेचे खोरे सुजलाम आणि सुफलाम करून टाकले आहे.

        पूर्व वैदर्भीय पोवारांच्या या दीर्घकालीन विदर्भ वास्तव्यामुळे त्यांच्या भाषेचा मूळ तोंडवळाच बदलून गेला आहे. तिचा घाट जरी माळवी असला तरी थाट मात्र नागपूरी (झाडीबोलीय) आहे. पोवारी बोली/भाषेची स्वर व्यवस्था अधिकांश हिंदी भाषेप्रमाणेच आहे. या बोलीत "ळ" हा ध्वनी नाही. मराठी शब्दातील "ळ"काराचा "र"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. यामुळे होळीची होरी आणि शेळीची सेरी होते. कधीकधी "ळ" चा "ड" देखील होतो. उदा. उथळ चे उथड व धर्मशाळा चे धरमसाडा असे रूप होते. शब्दारंभीच्या "व" चा "ब" होतो. जसे:- वेळू चा बेरू, वाळू चा बारू, विहीर चा बिहीर इ.
     पोवारांच्या बोली/भाषेत "श" हा ध्वनी नाही. "श"काराचा "स"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शिंगाचे सिंग व शेंगेचे सेंग होते. दन्त्य व तालव्य स्पर्शसंघर्षी ध्वनींमध्येही व्यवच्छेद आढळत नाही. प्रायः मुक्त-परिवर्तनच आढळते. यामुळे मराठीतील चांदी, चाळण, चवळी,  जांभई, जावई, जुना, झाकणी यासारखे शब्द पोवारीत चांदि, चारनि, चवरि, जांबइ, जवाई, जुनो, झाकनि याप्रमाणे उच्चारले जातात. या बोली/भाषेत "ण" हा ध्वनी नसल्याने बाणाचा बान बनतो व वेणीची बेनी बनते. शब्दारंभीच्या ए आणि ओ या स्वरांना य आणि व असे आगम होतात. यामुळे एकाचा येक व ओठाचा वठ होतो.
       पोवारीत हिंदीप्रमाणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशी लिंगे आहेत. या बोली/भाषेत आंगन, कनिस, घुबड, चमडा, जंगल, जांबुर इ. मराठीत नपुसकलिंगी असणारे शब्द पुल्लिंगी आहेत. तर नाक, पदक, परसाद, सरन, मालिस यासारखे शब्द स्त्रीलिंगी आहेत. सामान्यतः पुल्लिंगी नामे अकारान्त व स्त्रीलिंगी नामे इकारान्त असतात. विशेष म्हणजे, या बोली/भाषेत नामांना वचनविकार होत नाही. यामुळे येक घर, दुय घर, येक टुरा, दुय टुरा असेच अविचल रूप राहते. नामांचे सामान्य रूपही होत नाही. षष्ठीचा प्रत्यय "को" तर सप्तमीचा प्रत्यय "मा" असा आहे. जसे:- उनको नवकर, वको भाई, हातमा, बगीचामा, इ.
      अशा या ऐतिहासिक पोवारी/पवारी/पंवारी बोलीचे जागतिकीकरणानंतरचेे स्थान आता पुन्हा पुनर्स्थापित होत असून महाविद्यालयात शिक्षण घेत असलेेेेली पोवार समाजातील तरुण पिढी महाविद्यालयातही आपापसात सर्रास पोवारी बोलीत बोलू लागली आहे. ह्या बोलीत साहित्य-निर्मिती सुद्धा होत असून त्या साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी "राष्ट्रीय पवारी/पवार साहित्य, कला, संस्कृती मंडळा"ची स्थापना करण्यात आली असून 03 फेब्रुवारी २०१९ ला तिरोडा (जि.गोंदिया) येथे पहिले अखिल भारतीय पोवारी/पवारी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. 

        एकंदरीत "ध्वनीनिष्ठ" पोवारी बोली आता या जागतिकीकरणानंतरच्या रेट्याने "लिपीनिष्ठ" होण्याचा स्वावलंबी मार्ग अनुसरत आहे. आणि पर्यायाने प्रमाण भाषांना भिन्न-विभिन्न असे नवनवीन शब्द पूरवून प्रमाण भाषांना आणखी सुदृढ करण्यासाठी सज्ज होत आहे.
(शब्दसंख्या : सुमारे २३२५)
□□
◇विशेष टीप :- पोवार समाजाचाच एक समूह वर्धा, नागपूर या महाराष्ट्रातील तर छिंदवाडा, बैतूल या मध्यप्रदेशातील जिल्ह्यात वसला असून त्यांना भोयर पोवार/पवार असे संबोधिले जाते. त्यांची बोली सुद्धा भोयरी/भोयर पोवारी(पवारी) म्हणून संबीधिली जाते. वस्तूतः स्थलभेदामुळे या बोलीत अल्पसा फरक दिसत असला तरी पोवारी/पवारी बोली आणि ही भोयरी/भोयर पोवारी(पवारी) बोली थोड्याफार फरकाने अगदी सारख्याच आहेत.
□□
(बोलक = बोलणारे, बोहोला = मातीचा चौकोनी ओटा)
□□
@लखनसिंह कटरे
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया
(विदर्भ-महाराष्ट्र)
¤
(आधार व आभार : डाॅ.सु.बा.कुलकर्णी, श्री.गणेश देवी, डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे, श्री.जयपाल सिंह पटले)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
टीप :-
१)या लेखाचा एक संक्षिप्त भाग "अक्षरयात्रा" या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या (2018-2019 या वर्षीच्या) वार्षिकांकात प्रकाशित झालेला आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

जय जय राजाभोज


(चाल:- अंजणीच्या सुता तुला रामाचे वरदान.....) 

सिंधुल को बेटा, तोरो मालवामा राज
एक मुखलक बोलो रे बाबा
जय जय राजाभोज

पोवार को राजा, तोला सोनोको से ताज
एक मुखलक बोलो रे बाबा
जय जय राजाभोज

कला गुणको राजा, तोरो साहित्यमा राज
एक मुखलक बोलो रे बाबा
जय जय राजाभोज

रण मैदानमा होतो, तोर् समशेर को राज
एक मुखलक बोलो रे बाबा
जय जय राजाभोज

पोवार पुजसे तोला, वक हिरदयमासे राज
एक मुखलक बोलो रे बाबा
जय जय राजाभोज
*****
-डॉ. शेखराम परसरामजी येळेकर नागपूर २८/३/२०२०

Thursday, April 2, 2020

पोवार/पंवार समाज के विवाह के दस्तुर

पोवार/पंवार समाज के विवाह के दस्तुर
लेखक: भोजलालभाऊ पारधी, नागपुर

सृष्टी के निर्माण होते ही भगवान ने संसार का खेल रचाया तथा उसके दिन ब दिन विकास स निर्माण किये गये जीव को बढ़ाने के लिए नर मादा यह दो प्रकार के जीव पैदा किये तथा प्रजनन के लिए कुछ नियम बनाये। विवाह यह भी एक भगवान निर्धित नियम या बंधन है। जिसे भगवानों ने खुद अपनाया तथा विष्णुजी ने लक्ष्मी से, शिवजी ने पार्वती से और इन्द्र ने इद्रायणी से विधीपूर्वक विवाह रचाया।
           पुरातन काल से विवाह का बंधन एक नाजुक बंधन निरूपित कर उसे विधीपूर्वक अनेक दस्तुर बनाये गये। हमारा पोवारों का समाज क्षत्रिय वर्ण में आता है, शादी में ७ भावर की प्रथा प्रचलित हुई तथा अनेक दस्तुर बनाये गये। उन सारे दस्तुरो को विश्लेषणात्मक प्रारूप में लिखाया जाए तो एक बड़ी किताब बन जायेगी। इसलिए संक्षेप में विवाह के दस्तुरों को प्रस्तुत कर रहा हूं। आज से ६० - ७० साल पहले के दस्तुर लिए जाए तो उस वक्त ७ दिन तक दस्तुर हुआ करते थे। उनमें समय के अनुसार परिवर्तन किए गए और विवाह ५ दिन, फिर ३ दिन, फिर एक दिन पर आ गये। अब समय का इतना तकाजा है कि इतने कम समय में सारे दस्तर करना असंभव हो गया है । फिर भी अपने समाज के युवा - युवतियों को ज्ञात करने हेतु कुछ दस्तुर किए जा रहे है। वर - वधु की खोज विवाह प्रक्रिया में वर - वधु याने लडका लडकी की खोज करना अनिवार्य होता है। इसके लिए मित्र, परिवार रिश्तेदारों के मदत से वर - वधू खोज किया जाता है, खुद के भी लडका लडकी की बात खुद नहीं कर सकते , इसलिए बीच में मध्यस्थ की जरुरत होती है, जिसे माहती कहते है। यह माहती दोनों पक्षों को मिलाकर लड़का व लड़की देखकर पसंद किए जाते है और लड़का - लड़की, कुल, परिवार, गोत्र, पसंद आने के बाद दोनों तरफ से पसंती को आखरी मुहर लगाई जाती है तथा इसे पक्का करने के लिए (गुरी सुवारी या भातखानी) साधा खाना देकर दस - बीस रुपये से दोनों पक्ष पांव पढ़ते है। इससे शादी पक्की होने की प्राथमिक सम्मती मानी जाती है। उसके बाद शादी पक्की करने के लिए पांव लगाई, साक्षगंध या फलदान दोनों पक्ष की ओर से होता है। यह हुए बिना शादी पक्की नहीं मानी जाती। इसलिए दोनों पक्ष के ओर से शादी का यह पहला दस्तुर माना जाता है और शादी कानुनन पक्की मानी जाती है। 

१) पांव लगाई , साक्षगंध या फलदान: यह दस्तुर दोनों पक्ष के ओर से अलग - अलग तारीख को विवाह के पहले किया जाता है। इसमें वर - वधु के लिए कपडे, श्रृंगार का सामान, पांच प्रकार के फल, श्रीफल, सुटकेस वगैरा खरीदे जाते है तथा दोनों ओर से बाराती वर - वधु को कुमकुम शक्तिनुसार पैसे देकर पांव पड़ते है। यही कुमकुम और सामान शादी पक्की होने का साक्षीदार होता है। नाई द्वारा दुल्हन के कुमकुम से पांव लिखे जाते है तथा खाना खाकर अपने गांव वापस चले जाते है। 

२) मांडोधरी: मांडोधरी के लिए जंगल में जाकर १२ डेरी, ४ लकटे (फाटे) २५ बांस तथा जामुन की डगाल (टहनी) जरूरी होती है। १२ डेरी में से १ डेरी मोहई की अत्यावश्यक है क्योंकि वही खास लगुनडेर मानी जाती है। घर के मुहल्ले के लोग खेत से या जंगल में बैलगाडी ले जाकर उपरोक्त लकडी लाते है। बाद दुल्हे के घर वर को तथा दुल्हन के घर वधु की आरती सजाकर सवासिनी बाई लोग बैलगाडी के पास लाते है तथा चावल और कुमकुम डेरियों को तथा गाड़ी चालक को टिका लगाते है। 

३) मंडप डालना:  शादी शुरु होने के एक दिन पहले मंडप बनाया जाता है जो मांडोधरी लाई गई होती है उसे मुहल्ले के लोग तथा परिवार के ओर रिस्तेदार रात में मंडप डालते है और उसे सजाते है। गांव का बढ़ई बैठने का पाट, मायेदसाई के दो पाट बनाकर देता है, तथा बीच के डेर को दिया टांगने के लिए खुंटी बनाकर देता है। इसके लिए उसे पैसे भी दिये जाते है तथा सभी आमंत्रित निमंत्रित मेहमानों को चायपानी देकर मंडप का कार्य पूरा होता है। पहले के जमाने में मंडप डालने आनेवाले लोगों को खाना भी खिलाया जाता था । इसके बाद पांच सवासिनी सब्बल और बिवळा लेकर गांव के बाहर जाकर माटी खोदकर लाते है, उसे ही मागरमाटी या तेलपाटी कहते है। लाई गई माटी से माथन बेठ तथा चुलहा बनाया जाता है, इसे बहुत श्रध्दा से मंगलमय माना जाता है। लगुन डेर को दूध दही भात डालकर पांच जने डेर को गढ्ढे में डालते है तथा सुपारी पैसा हरकुंड की गाठ पीले कपड़े में (हल्दी लगा हुआ कपड़ा) बांधकर मोहई की लगुन डेर को बांधा जाता है। 

४)  बिजोरा: दोनो पक्ष के और से बिजोरे की बारात ले जायी जाती है तथा अच्छे ठाटबांट से,  बाजा बजाकर, खाचर से बारात ले जायी जाती है। पहले बारात दुल्हे के तरफ से दुल्हन के घर जाती है। इसमें बारातीयों की बहुत आवभगत होती है तथा पितल के कटोरे में सब बारातीयों के पांव धोये जाते है। फिर पहला चढ़ाव मंडप में होता है इसमें दुल्हन के लिये लाए गए कपड़े चढ़ाये जाते है। चढ़ावा के कपड़े पहनने के बाद दुसरा चढ़ावा घर में होता है तथा इस चढ़ावे में सोना, चांदी के जेवर चढ़ाये जाते है। तीसरा चढ़ावा मंडप के बाहर चार सुमी चारपाई बिछाकर चारों कोने पर चार बाराती तथा बिच में दुल्हे का बड़ा भाई बैठकर दुल्हन को गोद में बिठाकर बैठता है, और उसी वक्ती तीसरी साड़ी चढ़ाई जाती है। यह साड़ी शादी भर पहनी नहीं जाती तथा यह दिपावली के वक्त चरळ के दस्तुर में पहनी जाती है। इस प्रकार ३ दस्तुर दुल्हन के घर होते है। बाद में खाना खाने के बाद गणावे का दस्तुर होता है। इसमें ९ हरकंड, ९ सुपारी और ९ पैसे पाट के ऊपर ९ खाने बनाकर रखते है। दोनों पक्ष के समधी पाटपर आमने सामने बैठकर मंत्र के रुप में देवी देवताओं के नाम पुकारे जाते है तथा प्रत्येक नाम के पीछे १ पान (बिडा बनाया हुआ) देना पड़ता है । इसमें यदि पूरे मंत्र पढ़े जाये तो कुल ३६० बिडे लगते है। इसे ही पान जीतनी कहते है। सभी देवताओं को साक्षी के रूप में मंत्रोच्चार से बुलाया जाता है और उन ९ खानों की दो गाठे बनाई जाती है, एक में पांच तथा दूसरे में चार खाने की हलदी, सुपारी, पैसा बांधकर गाठे बनाई जाती है तथा वे गाठे दोनों पक्ष के मामा के पास रखी जाती है। इसे ही लगुन गाठ कहा जाता है। जनोसा देना - गणावे का दस्तुर होने के बाद जनोसा दिया जाता है। इसके लिए शादी के मकान के विरुध्द का मकान देखा जाता है। पुरातन काल में शादी के लिए लढाईयां भी होती थी इसलिए यह मकान अपना विश्वासू या पक्षधर के रुप में बनाते होगे क्योंकि यह मकान दुल्हे का खास मकान होता है, तथा दुल्हे की खाचर (गुडुर) उसी मकान में रखी जाती है। इसी प्रकार दुल्हे के तरफ दुल्हनवालों की भी बिजोरे की बारात जाती है। लेकिन वहां सिर्फ दो ही दस्तुर होते है। पहला चडाव मंडप में कपड़े चढ़ाये जाते है। दूसरा चढाव सोना - चांदी का इसमें शक्तिनुसार अंगुठी या घड़ी चढ़ाई जाती है और भोजन के बाद बारात वापस आती है। 

५) कांकन बांधना: दुल्हा और दुल्हन को अपने अपने मंडप में कणेरी पान पांच लेकर उसमें घनिया जीरा तथा चावल लपेटकर धागे में तांबे की अंगुठी (मुंदी या छल्ला) बांधकर दुल्हा - दुल्हन के बुवा, आत्या या फुवा अगर ये हाजर नहीं है तो बहन यह काकन बांध सकती है। दुल्हा और दुल्हन को दाहीने हात में यह बंधन बांधते है। इसमें ९ गाठे गिराई जाती है। कांकन बंधने के बाद ही असलियत में। दुल्हा - दुल्हन बनते है तथा इसके बाद कोई भी काम करने की सक्त मनाई रहती है। बाद में यही गाठे बाल खोलने के बाद दुल्हन के घर ही छोड़ी जाती है। 

६) हलदी चड़ाना: यह एक महत्वपूर्ण दस्तुर होता है, इसके लिए कुटूंब परिवार की महिलायें आरती तथा श्रीफल और पूजा का सामान लेकर जवाई (दामाद) साथ में बाजे सहीत जाते है तथा गांव के सभी देवताओं की पूजा करके शादी में सांसारिक जीवन में सुखशांति की आराधना की जाती है।

७) तेलमाटी या मागर माटी: इस दस्तुर के लिए कम से कम ५ सवासिनी गांव के बाहर सब्बल लेकर जाती है और विवले में (टोकनी) माटी भरते है, बाजे के साथ माटी घर में लाते है और उस माटी से चुल्हा तथा माथन बेठ बनाते है उसी चुल्हे पर खाने के लिए (प्रसाद समझकर) फुये बनाये जाते है और वे सबको बांटते है।

८) तेल चढ़ाई, माहे दसाई और मंडप सुतना: देवघर में कुलदेवता के सामने तेल चढाते है। और माटी के दिपक (नांदड) जलाकर बडे टोकन में रखकर उपर से परडा झाककर दुल्हन के माता - पिता या चाचा - चाची, भाई - भवजाई इनमें से जो भी हाजर हो यह टोकना पुरुष तथा केटली में पानी भरकर स्त्री छपरी से लेकर मंडप तक पानी की धार छोडकर लाते है। इन्हीं जोडे को माहे दसाई करने वाली कहते है। इसके लिए दोनों पुरुष स्त्री को उपवासी रहना पडता है। इसके लिए दोनों ला गाठजोडा बांधा जाता है। घर के अंदर माहेदसाई मंडप तक लाने के लिए लकडी के पाट पर माती की बेठ बना के बडे वृक्ष के पतो के १४ जोडी द्रोण चढाये जाते है तथा सोजी बनाकर चढाई जाती है ओर कुलदेवता गामदेवताओं की आराधना की जाती है। द्रोण बनाने का काम दामाद (जवाई ) को करना पडता है। 

९) मंडप सुतना: उसके बाद जवाई द्वारा मंडप के चारों दिशा व चारो कोने में सुत तथा आम के पत्ती की तोरण तथा रंगबिरंगी सजावट की जाती है। द्रोण के बदले में दामादों को खाजा देना पडता है, अन्यथा दामाद द्रोण छुपाकर रखते है, और खाजे के लिए रुसवा पकडते है। उन्हें खुश करना जरूरी होता।

१०) अहेर: (हल्दी) जवाई द्वारा मंडप में बिछायत करके दुल्हा दुल्हन को (अपने अपने मंडप में) लाकर बिठाते है इसके लिए समकुल ही बैठते है, अपने ही गोत्र के पुरुष एकतरफ तथा दुल्हा या दुल्हन के लाईन में जनाना बैठती है। इसके बाद जो हल्दी गांव के देवताओं को चढाई जाती है वही हल्दी (पिसी हुई गीली करके दल्हा दुल्हन को सवासीनी लेपन करती है तथा सभी बाई लोग तथा बैठे हूये परिवार वालों को हल्दी लगाई जाती है। हल्दी लगाने का कार्य पूर्ण होने के बाद आमंत्रित मेहमान महिलायें साथ में जो भी नये वस्त्र, धोती, साडी, दुपट्टा, रुमाल वगैरा लाते है। वे संबंधीत व्यक्ति को टिका लगाकर उपहार रुप में दिये जाते है।

११) डेरी पूजना: अहेर होने के बाद नये कपडो के टुकडे निकालकर कुलदेवता को चढाये जाते है, इसे दसी चढाना कहते है। बाद में घरवाले नये कपडे पहनकर मंडप के डेरीयों की पुजा करते है। इसके बाद घरवाले के ओर से जवाई तथा भांजे को यथाशक्ति नये कपडे देकर स्वागत किया जाता है। 

१२) जोडी नहाना: पुराने जमाने में अहेर पूर्ण होने के बाद ५ जोडे (लडकी जवाई ) याने ५ शादीसुदा लडकीया तथा जवाई को आमने सामने बिठाया जाता था। लड़की अपने पती को हल्दी लगाती थी और पती भी अपने पत्नी को गाल को हल्दी लगाते थे। उसके बाद दुल्हा या दुल्हन के साथ नहाते थे। 

१३) दुल्हा या दुल्हन को नहलाना: डेरी पूजने के बाद दुल्हा या दुल्हन को मंडप में नहलाया जाता है। इसके लिए मिट्टी की दो दो करई में पानी भरकर चार कोने पर रखकर उसे धागे से पांच धेरै गंडकर बननेवाले चौरस में दुल्हा या दुल्हन को बिठाकर पांच सवासिनी हल्दी लगाकर नहलाती है। आखिर में सभी आठो करई।का पानी इकट्ठा करके दुल्हा या दुल्हन के सर पर परडा रखकर छोडा जाता है। इसी को करस का पानी कहते है।

१४) लगुन की बारात के लिए देवघर में दुल्हे को सजाना: दुल्हे को शादी के सारे कपडे और साज श्रृंगार चढाकर माता, चाची याने (जिन्हे वरुमाये कहते है) पानी का कुरला तथा दुध पिलाना, कुल देवताओं की पुजा करना, माता ने दुल्हे की उंगली पकडकर मंडप में लाकर खडा करना तथा सब कुटुंब परिवार, रिस्तेदारों ने पांव पडना। इसके बाद सपटनी करना,  पुर्वजों को नेवैध चढाना तथा शादी निर्विघ्न निपटाने की याचना करना और साक्षी रहने की विनंती करना। कापड पकडनेवाला मजूर (कावडी) ने कावड बनाकर उसमें नमक, चावल, धोती तथा सुम (घास) पकडना और कावडीया यह कावड लेकर बारात के साथ चलता है। पांव पढ़ने के बाद दुल्हे को चंदोडे की ओळ (चादर या शाल) का मंडप ( छत ) बनाकर बीच में खडा करके बीच में तुतारी से उठाकर मंदीर जैसा सीन बनाकर बाजे बॅड, धुमाल, डफली के आवज तथा फटाके, बारुद के धमाके के साथ घर से बारात निकलती है। पुराने जमाने में बालविवाह होते थे इसलिए दुल्हे के जीजा या मामा दुल्हे को कंधे पर बिठाकर चलते थे। मंदीर पर आने के बाद पूजापाठ करके दुल्हे की माँ, चाची, भाभी वगैरे गुडुर के सामने आकर धुरपर आरती रखती है। (गुडुर याने दुल्हे के लिए सजाई गई बड़े बड़े बैलोवाली बड़ी से बड़ी खाचर जिसे जीतना सजाये कम होता है) आरती छुडाने को बारती पकडनेवाली महिला के भाई या पिता को सामने आकर आरती में पैसे डालकर छुडाना पड़ता है। उसके बाद दुल्हा गुडुर में बैठता है तथा सवासिनी (करौली) भी बैठती है, इन सबको मिठी शरबत पिलाकर बारात रवाना होती है। इस वक्त का माहौल जैसे कोई राजा महाराजा सजधजकर लश्कर सहित बँड बाजे, नगारे शहनाई सिंडा बजाते दुश्मन पर चढ़ाई करने जाने जैसा होता है। सभी की छाती आनंद और गर्व से फूली हुई होती है। सामने आनेवाले हर गांव के बाहर से ही बाजे का आवाज फटाके बारुद का शोरगुल के साथ धूमधाम से चलती है। बाजे फटाको का आवाज गुंजता रहता है। उन बैलों के गले के घोलर,  झील मोर पकट से एक मधुर संगीत निर्माण होता है और यह मन को बहुत भाता है।  बारात शादीवाले गांव के हनुमान मंदीर पर जाकर खडी हो जाती है। और वहां मंदी में श्रीफल चढाकर पुजा की जाती है। बाजेवालों को दुल्हन के घर भेजकर दुल्हन के तरफ से आरती सजाकर सभी घर बाराती आमंत्रित निमंत्रित मेहमान दुल्हा उतारने आते है। आरतीवाली महिला सवासीन गुडुर के धुर पर आरती रखती है। (पहले के जमाने में इस दस्तुर के लिए समधी को ज्यादा से ज्यादा पैसे डालने का प्रेशर डाला जाता था तथा कभी कभी झगडा भी हो जाता था) धुर छुटने के बाद आरती दुल्हे को उतारने गुडुर के पीछे आकर चंदोडो की ओल नीचे बिछाकर दुल्हे को तथा सवासिनी (करौली) यों को मिठी शरबत पिलाकर दुल्हे को उतारा जाता है। फिर भगवान के दर्शन करके चंदोलो की ओल काही छत बनाकर दुलहे को नाचते कुदते मंडप तक लाया जाता है। दुल्हा मंडप में पहुंचने के बाद मंडप पर जो शगुन बास डाला जाता है उसे हात पकडकर रखता है तथा मंडप पर से दुल्हन के जीजा रंग डालते है तथा उसके बाद दुल्हा वापस जानवासे पर पहुंच जाता है। इसे ही मांडो मारना कहते है। जनोसे पर दुल्हे को नहलाया जाता है और थोडे समय के लिए शांतता फैल जाती है। इसी समय के बीच में दुल्हे के तरफ से लाई गई कावड का सामान नमक, चावल, धोत, धोती वगैरा हर वक्त एक एक करके पहुचाये जाते है। इसके लिए कम से कम पाच बाराती जाते है तथा दुल्हन के तरफ से भी पांच बाराती आकर पांव धोते है, टीका लगाते है और चढावा स्वीकार करते है। इसे ही तेलगौडा, नोनगौडा की बाराते कहते है। इसके बाद दुल्हन के तरफ से खिर लाई जाती है और दुल्हे के साथ करोली सब मिलकर मिठी खीर खाते है। उसके बाद दुल्हा फिर से सजकर लग्न मंडप में पहुंचाया जाता है। इस समय के बीच दुल्हन का मंडप भी जातना सजाया जा सके उतना सजाते है। सभी बाराती आंगन में बिछायत पर बैठते है। दुल्हा मंडप के बाहर खडा किया जाता है और दुल्हन को सजाकर सामने खडी करते है। फिर जो लगुन गाठे मामाओं के पास रहती है उसे एक दुसरे को फेर दिया जाता है। इस समय दुल्हा दुल्हन को स्टेज या कुर्सी पर (पुराने जमाने में बास के टोकनों में) बिठाया जाता है। बैठते वक्त दुल्हे का मुह छपरी के तरफ तथा दुल्हन का मुंह अंगन के ओर रखा जाता है। फिर मामाओं ने दोनों के बीच जो धोती कापड के साथ आती है उसका अंतर - पाट बनाकर पकडा जाता है। इसी धोती को खरगनेत पाट बनाकर पकडा जाता है। इसी धोती को खरगनेत की धोती कहते है। 

१५) शादी लगाना : ब्राम्हण, पंडीत या बारातियों ने शुभमंगल कहना और पांच श्लोक के बाद दुल्हा दुल्हन का नाम लेकर सावधान करना। (पुराने जमाने में शादी लगानेवाला पंडीत घर के आडे पर चढकर सुर्यास्त होने का इंतजार करता था, जब सूर्य अस्त हो रहा होता है तभी शादी का आखरी शुभमंगल बोला जाता था इसी समय को गोधुली बेला की शादी कहते है। सावधान होते ही बाजे, नगाडे, बँड, शहनाई, धुमाल, बजाना तथा फटाके फोडने का काम होता है। दुल्हन के माँ ने दुल्हा दुल्हन को पान का बिडा चखाना और सोना या दाब कहना। दुल्हे ने सोना कहां तो ठी नहीं तो तुम्हारे माँ ने डाला गाव ऐसा मुहावरा छोडना। इसी बीच बारातियों तथा ग्रामनिवासियों को पान सुपारी, इतर लगाना, गलाब जल छिडकना यह रस्म अदा होती रहती है। दुल्हा - दुल्हन को घर में ले जाते वक्त दुल्हन के माँ ने दुल्हे की अंगुली तथा दुल्ले ने दुल्हन की अंगुली पकडकर चलना, दरवाजे पर आजीयो ने या भावजोने दरवाजा रोककर दुल्हन से दुल्हे का और दुल्हे से दुल्हन का नाम पुछाना और मजाक करती है। घर में जाकर नास्ता पानी तथा हंसी मजाक करना चलते रहता है। 

१६) समधी भेट : इसी वक्त मंडप के बाहर अच्छी बिछायत करके दोनों पक्ष के रिश्तेदार को दो ग्रुप में बिठाकर पान सुपारी, अतर गुलाल छिडकाना, गुलाब जल छिडकना और पान बिडी माचीस का इस्तेमाल करना होता है। इसी दौरान दोनों पक्ष का नाम करके गले मिलकर परिचय किया जाता है। इसे ही समधी भेट कहते है। इसका मुख्य उद्देश्य दोनों पक्षों के रिस्ते संबंधी पहचान होती है। 

१७) भावर गिराना तथा दहेज : परिचय के साथ नास्ता पानी हंसी मजाक होने के बाद धोत (जो कावड के साथ आती है) उसे बाजेगाजे से मंडप में लाते है और दूल्हा दुल्हन को बैठने के लिए गुडुर और सहगुडुर (खाचर) की जुवाडी लाकर मंडप में रखी जाती है। उस पर दुल्हा दुल्हन को बिठाया जाता है। धोत के दो परडे के बीच में रखकर दुल्हा दुल्हन के सीर पर पांच बारातीयों के साथ सात बार घुमकर फेरे लिये जाते हैं तथा कुंवारी कन्या परणु जाये घी यह मंत्रोच्चार करके सात भावर का दस्तुर किया जाता है।

       उसके बाद दुल्हा दुलन को जुवाडी पर बिठाया जाता है तथा दुल्हन की माँ और पिताजी दोनों गाठ जोडा बांधकर वर - वधु के दुध तथा दुभारी से पांव धोते है। उसके बाद जो सुम (घास) कावड के साथ लाया जाता है उसकी कावडीया एक लंबी रस्सी बनाता है। तथा उसके पांच घेरे बनाकर उतनाही घागा के घेरे लेकर बीच में कनिक के गोले से चिपकाकर वर - वधु के गले में दुल्हे के छोटे भाई द्वारा पहनाया जाता है। इसे ही गोत गुथना कहते है। इसके बाद दहेज (आंदन) गिराना चालू होता है। और सभी इष्टमित्र, कदंच परिवार, रिश्तेदारों द्वारा शक्तिनुसार सप्रेम भेट दी जाती है। सप्रेम भेंट पूरी होने के बाद जवाई द्वारा गिनती करके दुल्हे पक्ष को सौंप दिया जाते है। आरपिर में दुल्हन के छोटे भाई द्वारा गोत छुड़ाया जाता है तथा इसके बदले गाय, भैस, बकरी, अन्नदान, और जो भी दे सकते है उसे कबुल करके गोत छुड़वाया जाता है। बाद में डेरी पूजकर खाना पीना होता है।

१८ ) बाल खेलना :विवाह के दूसरे दिन दुल्हा दुल्हन को मंडप में लाकर सारीफासा (हारजीत) का खेल होता है, इसमे गोटी के रुप में बाल फल्ली के दाने का उपयोग किया जाता है तथा दुल्हा दुल्हन एक दूसरे को उना का पूरा कहते है उना याने विषम जोडी तथा पूरा याने सम इस पर से हारजीत लगाई ली गई है। जाती है इसे वाल खेलना कहते है।  संभवतः इस खेल की प्रेरणा शिव - पार्वती के चौसर बाजी से 

१९) जोडी नहाना: बाल खेलना होने के बाद हारजीत किसी की भी हो,  क्षमा कर दिया जाता है तथा कोई दंड या सजा नहीं दी जाती और ५ जोडियां (दुल्हे के तरफ की दो और दुल्हन के तरफ की दो और दुलहा दुल्हन) ऐसी ५ जोडी मिलाकर यह कार्य होता है। इसमें बहने और जीजाओं का इस्तेमाल किया जाता है। दुल्हा दुल्हन के साथ नहाना होता है तथा इस वक्त पानी का कुरला एक दूसरे पर डालकर खूब पानी खर्च करके मौजमस्ती होती है। अपने अपने हसने वाली महिलाओं पर पानी डालकर मौज करते है। मीट्टी की करई और धागे से चौरस बनाकर उसमें दुल्हा दुल्हन को नहलाया जाता है और आठों करई का पानी इकट्ठा करके दुल्हे के सामने दुल्हन को खडी करके दोनों के हातों में हात रखकर ओंजल बनाई जाती है तथा परडे को शिरके उपर पकडकर वह करस का पानी डाला जाता है। उसके बाद दुल्हन को परडे में बिछाकर उपर से चादर या शाल ढालकर दुल्हे ने दुल्हन को उठाकर देवघर में ले जाना होता है,  तब आजिया दरवाजा रोककर दुल्हन को पकडकर नाचने को कहती है।  और तब तक नहीं छोडती जबतक दुल्हे को पकडे हुए ही खुद को न नचाये।  वैसे ही बाकी जोडी वाले भी अपने अपने पत्नीयों को उठाकर देवघर में ले जाते है। कपडे बदलने के बाद मंडप की डेरी पूजन किया जाता है। 

२०) ढेंडा: मंडप में चारपाई (चारसुमी खटीया) डालकर चंदोलो की ओल बिछाकर उसपर दुल्हे दुल्हन को खडा करके बाराती तथा महिला दुल्हा दुल्हन के पांव पढते है। पुराने जमाने में दुल्हा दुल्हन को कडे पर पुरुष लोग दोनों को लेकर नाचते थे। इस वक्त के पांव पढाई के पैसे बाजंत्री तथा नाई को होते है। इसे लैंडा नाचना कहते है।

२१) कुसुंबा: पराने जमाने में पानी भरने के लिए पैसे लेने देने का कोई ठराव नहीं होता या तथा कसंब में जीतना पैसा होता था इसके लिए पानी भरनेवाले आरती बनाकर पान सुपारी, रंग गुलाल, बिडी सिगरेट इतर गुलाब वगैरे सभी सामान खरीदकर पानदान सजाकर घरबाराती, बाराती सबको बुलाकर पानसुपारी देती थी तथा पैसा वसुल करती थी। इसमें दोनों पक्ष आमने सामने बैठकर दुल्हे का पिता दुल्हन के पिता से दुगना पैसा वसुलने की कोशिश की जाती थी। साथ में बैठनेवाले हर आदमी अपने शक्तिनुसार पैसा डालते थे। इसी वक्त जवाई को रंग डालने के उपलक्ष में और ७ काटवार, भाट इनको भी पैसा देकर खुश किया जाता था। वही कोटवार शादी होने की खबर शासन को देते थे। इसी को कुसुंबा कहते है। 

२२) सपटनी -दुल्हन की बिदाई : यह दस्तुर शादी भर में बड़ा ही नाजुक मोड पर होता है तथा जीवन का दुःख भरा क्षण होता है। दुल्हन का सारा परिवार और रिस्तेदार लडकी के बिछुडने का दुःख भरा गम में डुबे होते है। हर व्यक्ति का हृदय दर्द से हिल जाता है और अपने आपही आखों में आंसू आ जाते है। इस दस्तुर के वक्त देवघर में दुल्हा दुल्हन को सजाया जाता है तथा नाई दोनों के पाव लिखता है यानी पावों को रंग से सजाता है। दुल्हे का जिजा या भांजा फनोली के फुल को रंग में डुबारक चेहरे की सजावट करता है और फिर दुल्हा दुल्हन को मंडप लाकर खडे किया जाता है और घरवाले, मेहमान महिलायें सभी दुल्हा दुल्हन के पांव पढते है। इसके बाद नांदड को गंगार में पानी रखकर दुल्हा दुल्हन द्वारा घुमाकर बुझा दिया जाता है। इसे नांदेड बुझाना कहते है। इसी बीच कावड के साथ आये नमक और चावल को सवाई से बढाकर वापस दुल्हे पक्ष को लौटाया जाता है और दुल्हा दुल्हन को आखिर कन्यादान या लडकी सोपना, सपटनी के लिए दोनों पक्ष के पास ले जाया जाता है।

२३) लडकी सोपना ( कन्यादान ) : नांदेड बुझाने के बाद लड़की के पिता द्वारा दुल्हन को दुल्हे के पिताजी को सौप दिया जाता है तथा दुल्हन की सारी जिंदगी रक्षा करने की जिम्मेदारी दुल्हेपर और उसके परिवार पर सौंपी जाती है। इसे ही कन्यादान या लड़की सोपना कहते है। इसके लिए दुल्हा दुल्हन दोनो पक्ष के पिता, चाचा या बडे भाई मंडप के बाहर बिछायत पर आमने सामने बैठते है। पहले दुल्हन पक्ष के पास दुल्हा दुल्हन गोद में बिठाते है तथा दोनो समधी एक दूसरे को मिठाई, गुढ खिलाते है और दोनों समधी एकदूसरे को समधन का नाम पूछकर मजाक करते है। उसी प्रकार बाद में यह दस्तुर दुल्हा पक्ष के और से भी किया जाता है। इस दस्तुर के बाद दुल्हा दुल्हन वापस मंडप में नहीं जा सकते। इसी समय के बीच बारात की वापस जाने की पूर्ण तैयारी कर ली जाती है, खाचर बैल, गुडुर सजाना हो जाता है तथा गुड्डुर मंदीर के पास जाकर खड़ी कर दी जाती है। कन्यादान का दस्तुर होते ही दुल्हा दुल्हन को जीजा के कडे पर बिठाकर (बालविवाह समय) मंदी तक लाया जाता है, उस वक्त भी चंदोलो की ओळ का मंदीर नुमा सीन बनाकर बीच में दुल्हा दुल्हन को रखा जाता है, इस प्रकार बाजेगाजे और बारूद फटाके के आवाज में धूमधाम से हनुमानजी के मंदीर पर लाया जाता है। हनुमानजी की पूजा करने के बाद गुडुर के पास दुल्हा दुल्हन को लाया जाता है, तथा दुल्हन के तरफ की वरुमाम (सवासिनी) गुडुर की धुर पकड़ती है। इसी वक्त धुर छुडाने का काम आरती पकडनेवाली के पिता या भाई या अन्य रिश्तेदारो द्वारा पैसे चढ़ाकर होता है। इसके बाद दुल्हा - दुल्हन को गुडुर में बिठाकर साथ में करोली भी बैठती है और मिठी शरबत पिलाकर आखरी बिदाई की जाती है। दोनों ओर के समधी तथा मेहमान, बराती, एकदूसरे से रामराम लेकर बारात प्रस्थान होती है। रास्ते में हरगांव में बाजा नगाडे तथा बारुद फटाके का आवाज होता है तथा सभी खाचरे छकडे एक पीछे एक कतार में आराम से चलते है और आखिर अपने गांव के हनुमान मंदीर पर आकर बारात खडी हो जाती है। फिर बाजेवालों को घर आरती के लिए भेजा जाता है और घर से आरती सजाकर सभी मेहमान और महिलाये ग्रामवासी सब मिलकर दुल्हा दुल्हन के स्वागत के लिए मंदीर के पास इकट्ठा हो जाते है। आरती फिर से गुडुर के धुर पर रखी जाती है तथा इस वक्त दुल्हे का पिता आरती में पैसे डालकर धुर छुडाते है। इस वक्त आयी हुई लगभग सभी महिलाओं से धुर धराई जाती है, तथा दुल्हे के पिता सभी को यथाशक्ती पैसे देकर धुर छुडाई जाती है। इसी प्रकार दुल्हन तथा सवासिनी (करौली) को शरबत पानी पिलाकर चंदोलो की ओळ बिछाकर उसपर हात पकडकर (स्वागत स्वरूप) उतारा जाता है और हनुमानजी की पूजा अर्चना कर, नाचते कदते घर के फाटक पर आकर खडे होते है। 

२४) फाटक पर दुल्हा - दुल्हन का स्वागत : फाटक पर दो पनीहारीन सिर पर पानी का गुंड लेकर खडी रहती है, उनके गुंड में दुल्हा दुल्हन पैसे डालकर पांच बार पानी का करला लेते है। तब ढिमर लोग भी अपनी जाल आडी करके दुल्हा दहन को बक्षीस मांगते है, उन्हें भी यथाशक्ति पैसा देकर जाल से मुक्त होते है। फिर फाटक पर पाट रखकर घर की कदंब परिवार की सार आजे सास, जेठानी, काके सास सभी दुल्हा दुल्हन के पांव धोते हे इस वक्त दल्हन जब तक कछ उपहार देने का वादा नहीं होता तब तक आगे पांव नहीं बढाती। इसमें गहने, पैसे देकर दुल्हन का स्वागत किया जाता है।

Wednesday, April 1, 2020

अग्निवंशीय पंवारो के वर्तमान जाति/गोत्र/सरनेम/कुल, शासकीय नियम और आज के वैवाहिक सम्बन्ध के सामाजिक और वैधानिक नियम

अग्निवंशीय पंवारो के वर्तमान जाति/गोत्र/सरनेम/कुल, शासकीय नियम और आज के वैवाहिक सम्बन्ध के सामाजिक और वैधानिक नियम

मध्यप्रदेश और छत्तीसगढ़ शासन के अनुसार जाति  पोवार एवं पंवार( Powar & Panwar) है तथा महाराष्ट्र में पोवार( Powar) है और  शासकीय दस्तावेजों में यही नाम चलता है. 

मालवा में पंवार/पोवार जाति के लोग परमार उपनाम या सरनेम अपने नाम के आगे लगाते हैं. वर्धा घाटी( बैतूल, छिंदवाड़ा, वर्धा, नागपुर)के कुछ लोगो से चर्चा के बाद पता लगा की उनके जाति प्रमाण पत्र में जाति  भोयर और कुछ लोग जाति पोवार या पंवार लिखते है और नाम के आगे पवार उपनाम या सरनेम लगाते हैं. और भी समूह के सदस्य अपने जाती दस्तावेजों से बता सकते है. 

कई पोवार/पंवार/भोयर/भोयर जाति के लोग पवार या परमार सरनेम उपयोग कर रहे है और आज के शासकीय दस्तावेजों में यही दर्ज है. वर्तमान कानूनों नाम और सरनेम बदल तो सकते है पर जाति कभी नहीं बदलती और जन्म से मृत्यु तक वही रहेगी. अगर कोई लड़की अपनी जाति से बाहर विवाह करे तब उसकी संतान की जाति तो उसके पति की होगी पर लड़की की जाति कानूनी रूप से उसके पिता की ही होगी. 
वर्तमान में जाति राजपूत में पँवार या परमार उनकी गोत्र है और इन्हे अपने उपनाम या सरनेम के रूप में प्रयोग करते हैं. उसी प्रकार जाति मराठा में पवार एक कुल है वे सरनेम के रूप में पवार शब्द का प्रयोग करते हैं. वर्तमान की राजपूत और मराठा जाति में अपने पँवार या पवार गोत्र के बहार दूसरे गोत्र में शादी करते है यानि उनके यहाँ पँवार या पवार गोत्र या कुल की लड़की शादी के बाद पँवार(परमार) या पवार नहीं रह जाती बल्कि अपने पति के गोत्र की हो जाती है. जैसे अगर किसी पंवार गोत्र की शादी अगर तोमर गोत्र में हो जाये तो वो विवाह के बाद तोमर हो जाएगी और उनके बच्चे तोमर होंगे.

जबकि आज के परदृश्य पंवार/पोवार/भोयर/भोयार जाति में उनके अपने कुर/सरनेम या गोत्र हैं और उनसे बाहर विवाह होता है पर जाति  जीवन पर्यन्त पंवार/पोवार/भोयर/भोयार ही रहेगी.

ऋषि बिसेन 
नागपुर

पोवारी शब्दसंग्रह


पोवारी शब्द               हिंदी अर्थ

माशी अंधारो          = पहटिया का अंधेरा
झुनझुरका              = पहटिया
भूमसारो                 = सुबह सुबह।
सकार                    = सुबह।
तिरीप                    = सुबह की सूरज की किरण,धूप।
बेरू भर दिवस         = दिन के करीब आठ बजे का समय
महातनी बेरा            = दोपहर का समय
बिरानीबेरा               = सुर्यास्त का समय
लखलखती तपन       = तेज धूप
घामचरचरो               = पसीने से लथपथ
उखरी                      = पहले के जमाने का अनाज कुटने का साधन 
जातो                     = आटा पीसने की पत्थर की गोल चक्की
कोथरी                   = धान रखने का बड़ा ढोला
भदाळ.                  = बड़ा घड़ा (मटका)
गडू                        = लोटा
गंगार.                     = पाणी रखने का बडा पतेला
पेवली।                    = पान का सामान रखने की छोटी टोकनी
फोंगरी                     = चुल्हा फूकने का छोटा पाईप
सोरया                      = मिट्टी का छोटा मटका
रांधनखोली                =  रसोईघर
झोरा.                       = थैला
मंज्यार.                    = बीच में 
कोरामा.                    =  गोद में
मुठपारो                    = तवा पर ढ़कने वाला मिट्टी का झक्कन
धोड़ी             =  छोटा नाला
केतरा           =  कितना
कोंज्या           = कहाॅ
कितन            = किधर
अखिन            = और
चोंबक            = कंजूस
तोंड्यार                  = हमेशा गाली गलोच करने वाली स्त्री
धुरो                   = खेत की सीमा निर्धारन के लिए बनायी गई मेढ़
भानी                  = कासे या पीतल की बनी हुई बड़ी थाली
बटका                 = कटोरा          
बटकी                  = कटोरी               
मलोकि                = छोटा पतेला       
परी                     = चम्मच
सिलबट्टा               = मसाला पीसने का चौकोर पत्थर
हिरोती                 = मिर्ची पाउडर या हल्दी पाउडर
नोन.                  =  नमक
बहारी.                = झाड़ू
चुन                     = बेसन ,चना या लखोरी का आटा
भेद्रा                     = टमाटर
शेरनी                 = नारियल की बाटी जानेवाली प्रसाद
पंतुना                  = चूल्हे पर पानी गरम करने का मड़का
तोड़ा, पिंजन        = पाव में पहना जाने वाला चांदी का गहना
सरि                    = गले में पहना जाने वाला सोने का गहना
पाटली                = हाथ में पहनी जाने वाला सोने या चांदी की चूड़ी।
तर्पसाखरी            = कान में पहने जाने वाला आभूषण
मोट                     =  कुएं से पानी निकलने का रहाट

गाड़ो                   = बैलबंडी।
ओंगण्या             =  बंड़ी के आस को माखने के लिए तेल रखने का पात्र
जुवाड़ी               = बैलबंडीका बैल के खांदे पर रखा जाने वाला विशेष प्रकार का लकड़ा
धुरकोरी              = बैलबंडी या खाचर हाकने वाला
ठाव                  = भोजन के लिए परोसी गई थाली
ठावा                 = खटिया के लकड़ी से बनाए गए पाव
खोर।               =  रजाई का आवरण।
तपना               = स्नान करने के लिए पानी गर्म करने का पात्र
साजरो, बाका      = अच्छा
टूरा टुरी।            = लड़का लड़की
बिह्या                = शादी
करोली               = शादी में दूल्हा दुल्हन के साथ जाने वाली सहेलियां
करोली             =  करेला, एक सब्जी
भासरो             = जेठ, पति का बड़ा भाई
जीठानी            =  जेठानी पति की बड़ी भाभी
सूसरो।            =   ससुर
सासू।               =  सास
फुफू।                =  बुआ,पिता की बहन
भजो/ भजी       =  स्त्री के भाई का लड़का/लड़की
देरबेटा              = देवर का लड़का।
                                       
सिमनी              = मिट्टी के तेल की ढिबरी,दिया
चिमनी               =  चिड़िया
कावरा               =  कौआ
शेरी                  = बकरी
पाठरू             = बकरी का पिल्लू
बासरू            =   गाय का बछड़ा
बघारू            =  भैंस का बछड़ा
सरप              =  सांप
गेंडुर              = केंचुआ, earthworm
चाटा.              = मकोडा,चींटी
तेलमुंगी।          = काटने वाली लाल चिंटी
इजगुर।           =  छिपकली
मोंगसा             = मच्छर
खाड्डी,खराड़ी     =   गिलहरी
गोटा                =  पत्थर
हारा                =  बड़े आकार का बांस का बना टोकना
फरताळा          =  मिट्टी के दीवाल में की गई छोटी अलमारी
कुंजी               = चाबी, किल्ली
फूल                 =  मिट्टी के दीवार में बनाई गई छोटा सी सामान रखने की जगह 
कोठोली             = बकरी बांधने का स्थान,कमरा
कोठा                = मवेशी बाधने का स्थान
चवरी                = पोवार के पूर्वज जहा विराजमान रहते
भेली                 = गन्ने के जूस से बनाई गई गुड़
                         
गोड़कड़ी        = मोहफुल और सूखे आम से बनाई गई सब्जी

शेरना           = सुपेरी फोड़ने  का साधन
दादरा           =  आचार या किसी भी बरनी के उपर बांधने का पतला कपड़ा

कारो मस          = अत्यधिक काला
कंबड़जा           = बारीक पतली नाजुक लड़की
मोमदेल             

  पोवारी मुहावरा                       हिंदी अर्थ

• कारी की पिवरी होनो     =   गरीब से अमीर होना, गुस्सा होना।
• कारी मस पड़नो।  =  शर्म से पानी पानी होना।

• कोल्ह्या कुत्रा की धन =    अपना वारिस न होने  पर कोई दूसरे को संपत्ति होना।

• कारो धुव्वा को जानो =  किसी भी कम के लिए जादा समय लगाकर जल्दी वापस न आना।

• गलड्या गडू।  = जिधर फायदा दिखा उधर चले जाना।

• डोरा वरत्या आवनो =    अहंकार में चूर होना
दीठ लगनो नजर लगना।

• कमाई न धमाई टेकरी पर पुंजना   =  दो पैसे की कमाई, नहीं पर बड़ी बड़ी बाते करना।

•मोठो मोठो की मांदी ना भागा बाई की चिंधी = अमीर लोगों के बीच गरीबोंकी इज्जत ना होना

• मुद्दल दुन ब्याज प्यारी  = बेटे से भी ज्यादा पोता पोतियों से प्यार होना।

• आयतों पर रायतो। = कोई काम खत्म होने पर आना।/किसी के संपत्ति पर राज करना।

                    - सौ छाया सुरेंद्र पारधी

कृष्ण अना गोपी

मी बी राधा बन जाऊ बंसी बजय्या, रास रचय्या गोकुलको कन्हैया लाडको नटखट नंदलाल देखो माखनचोर नाव से यको!!१!! मधुर तोरो बंसीकी तान भू...